AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2023 | 2:48 PM
Share

महाराष्ट्र : जुलै महिन्यात महाराष्ट्रातील (maharashtra) काही जिल्ह्यात अतिवृष्टी (heavy rain) झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी चांगलीचं वाढली आहे. विशेष म्हणजे काही धरणं पुर्णपणे क्षमतेनं भरली आहेत. त्यामुळे अनेक धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने मागच्या काही दिवसात जोरदार हजेरी लावलेली आहे. गोसीखुर्द धरणाच्या (gosikhurd damp) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून 62 हजार 935 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील 9 तासात धरणातून टप्प्याटप्प्यानं पाणी विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळं नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भाम धरणासाठी नुकताचं ५१० कोटींचा खर्च करण्यात आलेला आहे. भाम धरणाची निर्मिती फक्त मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी केली आहे. आज हे धरण पूर्णपणे क्षमतेचं भरलं असून तिथल्या नदीला पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे तिथल्या काही गावांना सतर्क राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

मावळात दमदार पडलेल्या पावसाने मावळची तहान भागविणारे पवना धरण काही दिवसात पुर्णपणे भरण्याची शक्यता आहे. पवना नदी पात्रात 1310.02 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर लोकांनी पाण्यात उतरु नये तसेच अत्यावश्यक स्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.