AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 04, 2023 | 2:48 PM
Share

महाराष्ट्र : जुलै महिन्यात महाराष्ट्रातील (maharashtra) काही जिल्ह्यात अतिवृष्टी (heavy rain) झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी चांगलीचं वाढली आहे. विशेष म्हणजे काही धरणं पुर्णपणे क्षमतेनं भरली आहेत. त्यामुळे अनेक धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने मागच्या काही दिवसात जोरदार हजेरी लावलेली आहे. गोसीखुर्द धरणाच्या (gosikhurd damp) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून 62 हजार 935 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील 9 तासात धरणातून टप्प्याटप्प्यानं पाणी विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळं नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भाम धरणासाठी नुकताचं ५१० कोटींचा खर्च करण्यात आलेला आहे. भाम धरणाची निर्मिती फक्त मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी केली आहे. आज हे धरण पूर्णपणे क्षमतेचं भरलं असून तिथल्या नदीला पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे तिथल्या काही गावांना सतर्क राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

मावळात दमदार पडलेल्या पावसाने मावळची तहान भागविणारे पवना धरण काही दिवसात पुर्णपणे भरण्याची शक्यता आहे. पवना नदी पात्रात 1310.02 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर लोकांनी पाण्यात उतरु नये तसेच अत्यावश्यक स्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार