AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना खासदारकी मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; कोर्टात नेमकं काय घडलं?

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना खासदारकी मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; कोर्टात नेमकं काय घडलं?
| Edited By: | Updated on: Aug 04, 2023 | 2:59 PM
Share

नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरनेम प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संसदेच्या अधिवेशनातच राहुल गांधी संसदेत दिसण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसने ट्विट करत सत्यमेव जयते असं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सत्र न्यायालयाला फटकारलं आहे. ट्रायल कोर्टाला एवढी मोठी शिक्षा देण्याची गरज काय होती? एवढी शिक्षा देण्यामागचं कारणही कोर्टाने दिलेलं नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यावेळी कोर्टाने राहुल गांधी यांना कानपिचक्याही दिल्या आहेत. राहुल गांधी यांचं विधान आपत्तीकारक होतं. मात्र, एवढी मोठी शिक्षा देण्याचं कारण कनिष्ठ न्यायालयाने स्पष्ट केलेलं नाही. तसेच त्यावर गुजरात उच्च न्यायालयाने विचारही केला नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

काँग्रेसकडून स्वागत

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसने कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. द्वेषावर प्रेमाने मिळवलेला हा विजय आहे. सत्यमेव जयते, जय हिंद, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.

कोर्टात काय झालं?

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणईसाठी अर्ध्या तासाची वेळ राखून ठेवण्यात आली होती. दोन्ही पक्षाच्या वकिलांना केवळ 15-15 मिनिटे बाजू मांडण्यासाठी दिले होते. आम्ही कोणत्याही समुदायाचा अपमान केला नाही. या प्रकरणात केवळ राहुल गांधी यांनाच शिक्षा सुनावण्यात आल्याचं राहुल गांधी यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितलं.

पूर्णेश मोदी यांनी जो युक्तिवाद केला होता, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात भाष्य केलं. तुम्हाला किती नेत्यांची जुनी भाषणे आठवतात?, असा सवाल कोर्टाने केला.

राहुल गांधींविरोधात पुरावा नाही

राहुल गांधी यांनी भाषणात ज्या लोकांची नावे घेतली आहेत. त्यापैकी कुणीच खटला दाखल केलेला नाही. फक्त भाजपच्या नेत्यांनी खटला दाखल केला आहे. याचिका दाखल करणाऱ्याचं खरं आडनाव मोदी नाही. त्यांचं आडनाव मोध आहे. त्यावरून ते मोदी झाले. त्यामुळे राहुल गांधी यांनी कुणाचीही बदनामी केलेली नाही. त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असं राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं.

मोदी आडनावाने बदनामी नाही

दरम्यान, मोदी आडनाव घेतल्याने कुणाचीही बदनामी झाली नाही. पण राहुल गांधी यांनी बोलताना जपून प्रतिक्रिया द्यावी, असं कोर्टाने म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.