AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते: अशोक चव्हाण

भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. | Ashok Chavan

दिल्लीतील नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते: अशोक चव्हाण
| Updated on: Oct 30, 2020 | 5:57 PM
Share

परभणी: विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. (Ashok Chavan on alliance with shivsena after Maharashtra assembly Election)

विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकणारे परभणीतील बडे नेते सुरेश नागरे यांनी पक्षात घरवापसी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. काँग्रेस कमिटीच्या बैठकीसाठी अशोक चव्हाण परभणीत होते.

परभणी शहरातील एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात बैठक झाली. जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसींच्या पदाधिकाऱ्यांना अशोक चव्हाणांच्या हस्ते नियुक्त पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश नागरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांवरही टीकास्त्र सोडले. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना सवय लागेपर्यंत व्यापारी हवे तेवढे पैसे देतील. पण दोन-चार वर्षानंतर या कायद्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु होईल. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ, अशी काँग्रेसची विनंती आहे.  विशेष गोष्ट म्हणजे कंगना रनौत आणि दिलेर मेहंदी हा कायदा योग्य असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे भाजपची नेमकी भूमिका काय आहे, हे कळायला मार्ग नाही. भाजपवाले कंगनाला कुठपर्यंत नेणार, हे माहिती नाही, अशी टिप्पणीही अशोक चव्हाण यांनी केली.

‘मराठवाड्याला जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार’ सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला, पण मराठवाड्याला अधिकचा निधी देण्याची माझी भूमिका असल्याची ग्वाही यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली.

संबंधित बातम्या:

विधानसभेपूर्वी काँग्रेसला रामराम, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत बड्या नेत्याची पक्षात घरवापसी

धुळ्यात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु, अनिल गोटेंच्या नेतृत्वात नेत्याचा पक्षप्रवेश

महाविकासआघाडी सरकार अपघाताने एकत्र – प्रविण दरेकर

(Ashok Chavan on alliance with shivsena after Maharashtra assembly Election)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.