AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस, जयंत पाटलांचा एकाच विमानातून प्रवास, चर्चेला उधाण, गुलाबराव पाटलांनी केलं मोठं विधान

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी मोठं विधान केलं आहे.

फडणवीस, जयंत पाटलांचा एकाच विमानातून प्रवास, चर्चेला उधाण, गुलाबराव पाटलांनी केलं मोठं विधान
gulabrao patilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 09, 2026 | 5:22 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. राजकीय वर्तुळात या विमान प्रवासाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विमानामध्ये काय कोणीही प्रवास करू शकतो. आता विमानामधून प्रवास करताना माझ्यासोबत राहुल गांधी देखील प्रवास करू शकतात. प्रवास करायला काय मनाई आहे का? असा सवाल यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली नाही, यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा कार्यक्रमात व्यस्थ असतील त्यामुळे भेट झाली नसेल असं त्यांनी म्हटलं आहे. अमित शहा आले आणि ते भेट घेऊ शकत नाही असं होऊ शकत नाही, व्यस्त कार्यक्रमांमुळे भेट होऊ शकली नसेल, किंवा घेतली नसेल. भेट नाही दिली म्हणून काय होतं?  एखादेवेळी भेट होत नाही, असं यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देखील यावेळी पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम असतो. ज्यांना वेळ दिलेली असते त्यांना ते भेटतात. उद्धव साहेबांनी पण वेळ माघावी. त्यांनाही भेटण्यासाठी वेळ मिळेल, असा टोला यावेळी पाटील यांनी ठाकरेंना लगावला आहे.

आज बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान कोसळून अपघात झाला आहे, यावर देखील गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही.  भारतीय विमान प्राधिकरणाने कुठे कुठे अशा घटना घडतात त्यांची नोंद घेतली पाहिजे. आणि पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, त्यासाठी आवश्यक ती पाऊलं उचलली गेली पाहिजेत असं यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा