AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडचा नवा पालकमंत्री कोण? फडणवीसांचं मोठं वक्तव्य, चर्चेला उधाण

बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बीडचा नवा पालकमंत्री कोण? फडणवीसांचं मोठं वक्तव्य, चर्चेला उधाण
| Updated on: Dec 24, 2024 | 5:27 PM
Share

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अधिवेशनाच्या एक दिवस आधी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खात्याचं वाटप देखील करण्यात आलं. दरम्यान खाते वाटपानंतर आता सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे पालकमंत्रिपदाच्या वाटपाकडे, महायुतीमध्ये अनेक जागांवर पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे.

सध्या बीड जिल्हा सर्वाधिक चर्चेमध्ये आहे, काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. यातील काही आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये. आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं अश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. दरम्यान त्यानंतर आता बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. यावेळीही त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता,  बीडचं पालकमंत्री पद कोणाला द्यायचं यासंदर्भात मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच बीडमध्ये कोणाचीही दादगिरी आम्ही चालू देणार नाही असा इशाराही यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.

दरम्यान दुसरीकडे काल पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे . अजितदादा तुम्ही पुण्याचं पालकमंत्री घेतलं तेव्हा आपण पुण्यातील कोयता गँगची दहशत संपवली, आता तुम्ही बीड आणि परभणीचं देखील पालकमंत्रिपद स्विकारा अशा अशायचं एक ट्विट मिटकरी यांनी केलं होतं. या ट्विटनंतर चर्चेला उधाण आलं आहे. गेल्यावेळी बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं होतं, यावेळीही तेच पालकमंत्री होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.