AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतून गावी परतला, घरी न जाता थेट शेतात जाऊन राहिला, तरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण गावी जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढताना (Dhule Corona Patient Chain Breaker) दिसत आहे.

मुंबईतून गावी परतला, घरी न जाता थेट शेतात जाऊन राहिला, तरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला
| Updated on: May 11, 2020 | 3:11 PM
Share

धुळे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Dhule Corona Patient Chain Breaker) आहे. तसेच बरं होऊन घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. कोरोनाने सुरुवातीला मुंबई आणि पुणे या ठिकाणी विळखा घातला. त्यानंतर मुंबई आणि पुण्याहून अनेक लोक गावाकडे येण्यास निघाले. लॉकडाऊन असतानाही अनेकांनी चालत गाव गाठलं. यात शहरातून आलेल्या काहींना कोरोनाची लागण झाली. मात्र मुंबईतून धुळ्यात परतलेल्या एका तरुणाच्या दक्षतेमुळे संपूर्ण गावाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नाही.

धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात डांगुर्णे गावातील एक तरुण मुंबईतून आला (Dhule Corona Patient Chain Breaker) होता. मात्र या तरुणाने घरी न जाता आपल्या शेतात राहण्याचा निर्णय घेतला. हा तरुण उच्चशिक्षित असून तो एका कंपनीत कामाला आहे. त्यामुळे त्याला संसर्गाचा परिणाम माहिती होता. त्यानुसार त्याने कुटुंबाला न भेटता शेतातच वास्तव्य केलं.

तो तरुण शेतात राहत असताना तीन दिवसांनी त्याला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याने स्वत: हून दवाखाना गाठला. श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाण गेल्यानंतर त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र मुंबईतून आल्यानंतर या तरुणाने शेतात वास्तव्य केल्याने गावात इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही.

या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर दहा दिवसांनी या तरुणाने कोरोनावर मात केली आहे. तो पूर्णपणे ठणठणीत बरा झाला.

दरम्यान या तरुणाच्या दक्षतापूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्यासह संपूर्ण कुटुंबाचं कौतुक केलं जात आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अक्षय तृतीया सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण अक्षय तृतीयाच्या दिवशीही हा मुलगा शेतातच होता. या दिवशी कोणीही त्या भेटण्यासाठी गेले नव्हते.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण गावी जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत साखरी, शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यातील शिरपूर तालुका कोरोना मुक्त झाला आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील तीन पैकी दोन रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या गावी परतले आहेत. त्याशिवाय चिमठाणे गावातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने सध्या ते उपचार घेत (Dhule Corona Patient Chain Breaker) आहेत.

संबंधित बातम्या : 

17 मेनंतर काय? पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, पाचव्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा

सोलापुरात 16 पोलिसांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील आकडा 250 वर

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.