AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, नागरिकांसह पालिकाही चिंतेत, नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येत वाढ

धुळे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ एकाच वेळी 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, नागरिकांसह पालिकाही चिंतेत, नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येत वाढ
Dhule Dog Death
| Updated on: Oct 04, 2025 | 4:12 PM
Share

धुळे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील देवपूर भागात 12 श्वानांचा मृत्यू झाला आहे. देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ एकाच वेळी 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या श्वानांच्या मृत्यूचे कारण काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच या श्वानांच्या मृत्यूमुळे नागरिकांना काही धोका तर नाही ना? हेही शोधले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धुळ्यात 12 श्वानांचा मृत्यू

गेल्या काही काळापासून धुळे शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या श्वानांमुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ 12 श्वानांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांसह पालिका प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. अनेकदा श्वानांमुळे अपघातही होत असतात. तसेच काही श्वान लहान मुलांवर आणि वृद्ध व्यक्तींवर हल्लाही करत असतात. त्यामुळे श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी धुळे महापालिका प्रशासनाकडून श्वान निर्बिजीकरण सुरू करण्यात आले आहे.

नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येत वाढ

धुळ्यात श्वानांचा मृत्यू का झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मानवी हस्तक्षेपामुळे या श्वानांचा मृत्यू झाला का हे तपासणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

श्वानांमुळे कोणते आजार होतात?

श्वानांमुळे माणसांमध्ये काही संसर्गजन्य आजार होऊ शकतात. सर्वात गंभीर आजार म्हणजे रेबीज, जो कुत्र्याच्या चाव्यामुळे होतो, ज्यामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो. लेप्टोस्पायरोसिस हा आजार कुत्र्यांच्या मूत्रामुळे पसरतो. हायडेटिड रोग परजीवीमुळे होतो आणि यकृत व फुफ्फुसांवर परिणाम करतो. साल्मोनेला आणि स्कॅबीज हे रोगही कुत्र्यांमुळे होऊ शकतात. अशा आजारांपासून बचावासाठी कुत्र्यांचे नियमित लसीकरण, स्वच्छता आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. श्वानाने चावा घेतल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत