AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदी म्हणाले, 4 जूनला आमची एक्सपायरी डेट, अहो, तुमचा बुरशी आलेला माल…’, ठाकरेंची तोफ धुळ्यात बरसली

"मोदी आज तिकडे बोलले की, 4 जूनला आमची एक्सपायरी डेट आहे. अहो, तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे. तो 4 जूनला आम्ही केराच्या टोपलीत फेकून देणार आहोत", असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सभेत केला.

'मोदी म्हणाले, 4 जूनला आमची एक्सपायरी डेट, अहो, तुमचा बुरशी आलेला माल...', ठाकरेंची तोफ धुळ्यात बरसली
उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 07, 2024 | 7:27 PM
Share

महाविकास आघाडीची आज धुळ्यात सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. “धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवलेत? इथे शेतकरी आले आहेत. आलेत की नाही? कांद्याचे शेतकरी किती आहेत? कांदा उत्पादक शेतकरी, तुम्ही आनंदी आहात? निर्यात बंदी वगैरे छान चालू आहे. अजूनही हे निर्लज्ज, निवडणुका आल्या आहेत, माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची निर्यातबंदी उठवत नाहीत. तर गुजरातच्या शेतकऱ्यांची कांदा निर्यातबंदी उठवतात. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात तुम्ही भेदभाव का करतात? महाराष्ट्राने मोदीजी तुम्हाला गेल्या दोन वेळेला 40 पेक्षा अधिक खासदार निवडून दिले होते म्हणून तुम्ही दिल्ली पाहिली होती. या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही. माझी तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की, दरवेळेला मला विचारतात, नाना पटोले तुम्हाला विचार असतील की काय होणार? तुमची महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? आम्ही 48 च्या 48 जागा जिंकणार. का नाही जिंकायची?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मोदी आज तिकडे बोलले की, 4 जूनला आमची एक्सपायरी डेट आहे. अहो, तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे. तो 4 जूनला आम्ही केराच्या टोपलीत फेकून देणार आहोत. हे तुमचं सगळं बुरसटलेलं गोमुत्रधारी, ही अशी घाण लोकं आम्हाला नकोयत. शोभा ताई तुम्ही खासदार म्हणून आम्हाला तिकडे का हव्या आहेत? संविधानाचं रक्षण केलंच पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ह्यांना बदलून टाकायचीय’

“ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साध्या, दलित कुटुंबात जन्मात आलेला मुलगा हा एवढा बुद्धिमान कसा असू शकतो, त्याने लिहिलेली घटना ही या बुरसटलेल्या गोमुत्रधाऱ्यांना आता ओझं व्हायला लागली आहे. अरे त्या दलित माणसाने लिहिलेली घटना आम्ही काय म्हणून पाळायची? म्हणून यांना 400 पार खासदार करुन ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना ही ह्यांना बदलून टाकायची आहे”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

“शोभा ताई तुम्हाला या सर्व घटनांचं रक्षण करावं लागेल. ही सर्व जनता तुम्हाला निवडून देणार आहे. पहिले प्रथम त्या घटनेचं रक्षण करायला तुम्हाला निवडून देणार आहे. दुसरं ते काय निर्मला सीतारमण बोलल्या की, या देशात चार जाती आहेत. महिला, गरीब, शेतकरी आणि युवा. ठीक आहे, शेतकरी इकडे बसला आहे. कांदा निर्यातबंदी तुम्ही अडवली आहे. सोयाबीनला भाव देतायत? कापसाला भाव देतायत? मी तुम्हाला उघड प्रश्न विचारतो, आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आता कापसाला भाव मिळत होता. तेव्हा तो भाव आतापेक्षा जास्त होता की कमी होता? मग गद्दारी केली ती फक्त माझ्याशी किंवा शिवसेनेशी केलेली नाही. तर गद्दारी शेतकऱ्यांशी केलेली आहे. गद्दारी संपूर्ण महाराष्ट्राशी केलेली आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...