AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli : शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही; शाळकरी मुलांच्या वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर

चार रस्ता येथे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्याने अपघात झाला. मात्र इतर नागरिकांनी सतर्कता दाखवत ती रिक्षा लगेच थांबवल्याने मोठे नुकसान वा जीवितहानी झाली नाही.

Dombivli :  शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही; शाळकरी मुलांच्या वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर
| Updated on: Dec 20, 2023 | 3:03 PM
Share

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 20 डिसेंबर 2023 : डोंबिवली पूर्वेकडील चार रस्ता येथे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्याने अपघात झाला. मात्र इतर नागरिकांनी सतर्कता दाखवत ती रिक्षा लगेच थांबवल्याने मोठे नुकसान झाले नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून विद्यार्थीही सुखरूप आहेत. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटली , रिक्षा चालक रिक्षेच्या बाहेर फेकला गेला. मात्र स्थानिक नागरिकांनी धाव घेत रिक्षा थांबवत रिक्षेत असलेल्या तिन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान या प्रकरणी प्रकरणी वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकवर कारवाई करत त्याला 8 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अपघात झाला तेव्हा रिक्षामध्ये अवघी तीन मुलं होती पण एरवी या रिक्षा तब्बल 11 मुलं असतात अशी माहिती समोर आली आहे. एवढ्या लहान मुलांना, मोठ्या प्रमाणात रिक्षात कोंबून, दाटीवाटीने बसवून त्यांना प्रवास करायला लावल्याने त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा पद्धतीने रिक्षा चालक, धोकादायक रितीने रिक्षा चालवत असल्याच्या अनेक तक्रारी येऊनही आरटीओ अधिकारी तसेच वाहतूक पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रवासादरम्यान लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय झालं ?

आज (बुधवार) दुपारी 12 वाजताच्या सुमारास डोंबिवली चार रस्ता परिसरात एक रिक्षाचालक शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जात होता. मात्र अचानक त्याचा ताबा सुटला आणि रिक्षा चालकाने एक दुचाकीला धडक दिली. नंतर त्यातील रिक्षा चालक रिक्षेच्या बाहेर फेकला गेला. त्यावेळी मागे तीन शाळकरी विद्यार्थी रिक्षेतच होते. आणि त्यांच्यासह ती रिक्षा पुढे जाऊ लागली. पाहता पाहता ती रिक्षा पुढे जाऊन थेट फुटपाथवर चढली. मात्र तेथे असलेल्या नागरिकांनी सतर्कता दाखवत रिक्षा थांबवली आणि रिक्षेत असलेल्या तिन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले.

या मोठ्या अपघातानांतर सर्वच हबकले. पण सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. त्या रिक्षेचं बरंच काही नुकसान झालं आहे मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षेत मागे फक्त दोन मुलं होती. मागील सीट वर जागा असतानाही एका विद्यार्थ्याला चालकाच्या बाजूला बसवण्यात आले होते.त्यामुळे हा चालक चार रस्ता परीसरात बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ असताना आणि सिंगनल परीसर असतानाही वेगात रिक्षा चालवत होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे…याबाबत वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकाला वाहतुकीचे नियम तोडले म्हणून 8000 चा दंड ठोठावला आहे. रिक्षा चालकांच्या बेदरकार पद्धतीने रिक्षा चालवणे याबद्दल तक्रारी येऊनही आरटीओ ,वाहतुक पोलिस कानाडोळा करत असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.