AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतापजनक! उंदीर मारण्याचे औषध टाकून 7 भटक्या श्वानांची हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivli : डोंबिवलीत उंदीर मारण्याच्या विषारी औषधामुळे सात भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतापजनक! उंदीर मारण्याचे औषध टाकून 7 भटक्या श्वानांची हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Dog KilledImage Credit source: Google
| Updated on: Mar 21, 2026 | 4:40 PM
Share

डोंबिवलीतून संतापजनक घटना समोर आली आहे. उंदीर मारण्याच्या विषारी औषधामुळे सात भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात एकलव्य अॅनिमल्स पेडिग्री कंपनीचे मालक वीरेंद्र कुमार निषाद यांच्यासह त्यांचा भाऊ आणि काही कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृत श्वानांचे शव पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले असून पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारले

डोंबिवलीजवळील धामटण गाव परिसरात भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. उंदीर मारण्याचे विषारी औषध परिसरात टाकून सात भटक्या कुत्र्यांचा जीव घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राणीप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या सुचित्रा किशोर सुर्वे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारीत गंभीर आरोप

तक्रारीनुसार, सुचित्रा सुर्वे या गेल्या दोन वर्षांपासून धामटण गावातील एकलव्य कारखाना परिसरात राहत असून त्या 2021 पासून भटक्या कुत्र्यांना अन्न देत आहेत. त्यांच्या घराजवळच एकलव्य अॅनिमल्स पेडिग्री कंपनीचा कारखाना असून त्याचे मालक वीरेंद्र कुमार निषाद, त्यांचा भाऊ आणि काही कामगार यांनी 12 मार्च 2026 पासून परिसरात उंदीर मारण्याची पावडर टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. ही विषारी पावडर खाल्ल्याने सुरुवातीला चार आणि त्यानंतर आणखी तीन अशा एकूण सात कुत्र्यांचा मृत्यू झाला. तसेच याआधीही अशाच पद्धतीने एकूण 36 भटकी व पाळीव कुत्री मारल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पाळीव श्वानालाही मारण्याची धमकी

याबाबत जाब विचारला असता आरोपींनी ‘मी भटक्या कुत्र्यांना मारणारच, तुमच्या पाळीव श्वानालाही मारणार’ अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी वीरेंद्र कुमार निषाद, त्यांचा भाऊ आणि काही कामगारांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कठोर कारवाई होणार

दरम्यान, मृत कुत्र्यांचे शव पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत सुमारे 90 हजार भटकी कुत्री असल्याची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या महासभेत या विषयावर चर्चा झाली होती. मात्र या घटनेमुळे प्राणी संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Follow Us
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.