“लंपी” विषाणूचा शिरकाव आता नाशकातही, कोणत्या गावात जनावरांना झाली “लंपी”ची लागण?

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

|

Updated on: Sep 12, 2022 | 6:14 PM

नाशिक शहर हद्दीपासून ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर पांगरी आणि दुसंगवाडी ही दोन्ही गावे आहेत. त्या गावातील जनावरांना लंपी ह्या नव्या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

लंपी विषाणूचा शिरकाव आता नाशकातही, कोणत्या गावात जनावरांना झाली लंपीची लागण?
Image Credit source: FACEBOOK

नाशिक : बळीराजासमोर (Farmer) आता आणखी एक नवं संकट उभे राहीले आहे. शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या पशूपालनात एका नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. जनावरांना लंपी (lampivirus) विषाणूची लागण होत असल्याचे समोर आले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये लंपी विषाणूने कहर केला असून लंपी विषाणूने अनेक जनावरांचा जीव घेतला असून मृत्यूचा (Death) खच पडल्याचे समोर आले आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील राज्यांमधील अनेक जिल्ह्यात असे विषाणूची लागण झालेली जनावरे आढळून येत आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी आणि दुसंगवाडी या दोन्ही गावात लंपी या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. नाशिकमध्ये या विषाणूचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून तातडीने प्राथमिक उपचार करण्याच्या सूचना पशू वैद्यकीय विभागाला जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिले आहे.

नाशिक शहर हद्दीपासून ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर पांगरी आणि दुसंगवाडी ही दोन्ही गावे आहेत. त्या गावातील जनावरांना लंपी ह्या नव्या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

याबाबत नाशिक जिल्हा प्रशासनाने तातडीने संबंधित गावांना भेटी देत आढावा घेतला आहे. जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने विषाणूबाधित जनावरांना उपलब्ध असलेले औषधे देत लसी टोचण्याच्या सूचना दिल्या आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील उस्मानाबाद, अहमदनगर, परभणी, जळगाव, अकोला, बीड, कोल्हापूर, धुळे, सातारा, औरंगाबाद, लातूर, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये लंपी विषाणूचा शिरकाव झाल्याची माहिती आत्तापर्यन्त समोर आली आहे.

शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय हा सर्वाधिक सोयीस्कर असा व्यवसाय आहे. त्यातच शेती पीक घेत असतांना कधी अस्मानी संकट किंवा सुलतानी संकट आले तर दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांना तारण्यासाठी महत्वाचा आधार असतो.

मात्र, आधीच मुसळधार पावसाने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्याच्या नशिबी आणखी एक नवं संकट उभे राहिले आहे. लंपीचा संसर्ग वाढू नये, यासाठी सरकार शर्तीचे प्रयत्न करीत आहे.

औषधोपचार करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्या तरी शेतकऱ्यांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.

बाधित क्षेत्रातील जनावरांचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर द्यावा अशा सूचना प्रशासन देत आहे. याशिवाय बाधित क्षेत्राच्या दहा किलोमीटर अंतरावर जनावरांचा बाजार भरवू नये अशाही सूचना दिल्या असून जनावरांची वाहतूक टाळावी असे देखील आवाहन जिल्हा प्रशासन करीत आहे.

जनावरांच्या बाबतीत कुठलीही शंका आल्यास तातडीने स्थानिक पातळीवर नेमलेल्या पशू वैद्यकीय शीघ्र कृती दलाशी संपर्क साधावा, प्रशासनाला याबाबत लागलीच माहिती द्या, जनावरे आजारी पडल्यास माहिती लपवून ठेऊ नका असे देखील प्रशासनाने सूचना केल्या आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI