AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये आता आणखी एका सरपंचाच कुटुंब दहशतीखाली, खंडणी मागत दिली जीवे मारण्याची धमकी

बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे, बीडमधील एका महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे, तसेच जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.

बीडमध्ये आता आणखी एका सरपंचाच कुटुंब दहशतीखाली, खंडणी मागत दिली जीवे मारण्याची धमकी
Follow us
| Updated on: Jan 18, 2025 | 5:33 PM

बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. मस्साजोगचं प्रकरण ताजं असतानाच आता एका महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली आहे. त्रासाला कंटाळलेल्या या महिला सरपंचाकडून आता आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचं या महिलेनं म्हटलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मस्साजोग येथील सरपंचाची हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) येथे उघडकीस आला आहे. महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी करत  जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे या महिलेचं कुटुंब दहशतीच्या सावटाखाली आहे. त्रासाला  कंटाळलेल्या या महिला सरपंचाकडून आता थेट आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

मंगलाबाई राम मामडगे असं या महिला सरपंचाच नाव आहे. त्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) गावाच्या सरपंच आहेत. त्यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. या महिलेनं आता या प्रकरणात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू असं मंगलाबाई यांनी म्हटलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी  बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना एक खंडणी प्रकरणाचं कनेक्शन देखील समोर आलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे सध्या बीडकडे लागलं आहे. मात्र असं असताना देखील आता आणखी एक महिला सरपंचाने आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.  जर न्याय मिळाला नाही तर आपण आत्मदहन करू असा इशारा देखील या प्रकरणात देण्यात आला आहे.

सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.