AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाकी सगळ्यासाठी कॉम्प्रमाईज, पण शिवाजी महाराजांसाठी नो कॉम्प्रमाईज, कोण म्हणालं असं…

धारवाडजवळ झालेली शिवाजी महाराजांची लढाई आणि ती करून पन्हाळा गडावर निघत असताना त्यांनी बेळगावमधून पन्हाळा गडाकडे प्रस्थान केले होते.

बाकी सगळ्यासाठी कॉम्प्रमाईज, पण शिवाजी महाराजांसाठी नो कॉम्प्रमाईज, कोण म्हणालं असं...
| Updated on: Dec 18, 2022 | 7:31 PM
Share

बेळगावः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा जवळचा संबंध आहे. दक्षिणविजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रस्थान केले तेव्हापासून बेळगाव आणि पन्हाळा गडाचा सहसंबंध असल्याची माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. होनगा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी माजी खासदार संभाजीराजे बोलत होते. यावेळी दक्षिणेकडे केलेली जिंजीपर्यंतची लढाई ही मराठी स्वराज्यासाठी होती कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले स्वराज्य सुराज्य व्हावे हीच त्यांची इच्छा होती असंही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी लढाई स्वराज्यासाठी केली म्हणजेच आपल्या माणसांना सुराज्य मिळावे यासाठी त्यांनी वेगवेगळ्या लढाया केल्या आणि त्या त्यांनी जिंकल्याही.

त्यामुळे धारवाडजवळ झालेली शिवाजी महाराजांची लढाई आणि ती करून पन्हाळा गडावर निघत असताना त्यांनी बेळगावमधून पन्हाळा गडाकडे प्रस्थान केले होते.

तेव्हापासून बेळगाव आणि महाराष्ट्राचा संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून आपला आणि कर्नाटकचा संबंध आहे.

त्यामुळे कर्नाटक सरकारने येथील मराठी भाषिकांची काळजी घेण्याची त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आजच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर जगाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराज यांची महती गाजत आहे. प्रत्येक क्षेत्रात शिवाजी महाराजांच्या कार्याची वेगळेपण दिसून येत असल्याचे मतही त्यांनी सांगितले.

आज बेळगावसारख्या भागात मला बोलवून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा जो सन्मान केला आहात. तो कायमस्वरूप लक्षात घेण्यासारखा असल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र, कर्नाटकात येऊन लढाया केल्या मात्र त्यापाठीमागे सुराज्याची भावना होती. तेव्हापासून मराठी आणि बेळगावचा सबंध असल्याचे सांगत कर्नाटक सरकारने येथील मराठी भाषिकांची काळजी घ्यावी असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.