Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू

मोठी बातमी समोर आली आहे, बदलापूरमध्ये अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीमध्ये उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2025 | 7:41 PM

आज सर्वत्र होळीचा उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे. मात्र अशा या वातावरणाला गालबोट लावणारी घटना बदलापूरमधून समोर आली आहे. अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धुलिवंदन झाल्यानंतर अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी ही चारही मुलं उल्हास नदीच्या पाण्यात उतरले होते.  मात्र त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं ती पाण्यात बुडाली.  आर्यन मेदर, आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग आणि ओमसिंग तोमर असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत.

हे चारही मुलं पोद्दार गृह संकुलातील रहिवासी होते. होळीनिमित्त धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी हे चारही मुलं आपल्या इतर मित्रांसोबत उल्हास नदीच्या काठावर आले.  ते नदीत उतरले. मात्र त्यांना नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या मुलांचा शोध घेतला. मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आलं. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  या घटनेने बदलापूर शहरात शोककळा पसरली आहे.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर 

सर्वत्र सणाचा उत्साह असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. अंगाला लागलेला रंग धुण्यासाठी ही मुलं उल्हास नदीवर गेली होती. त्यांच्यासोबत इतरही काही मुलं होती. ही मुलं नदीत उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चारही मुलांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऐन धुलिवंदनाच्या दिवशी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.