AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू

मोठी बातमी समोर आली आहे, बदलापूरमध्ये अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीमध्ये उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 14, 2025 | 7:41 PM
Share

आज सर्वत्र होळीचा उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे. मात्र अशा या वातावरणाला गालबोट लावणारी घटना बदलापूरमधून समोर आली आहे. अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धुलिवंदन झाल्यानंतर अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी ही चारही मुलं उल्हास नदीच्या पाण्यात उतरले होते.  मात्र त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं ती पाण्यात बुडाली.  आर्यन मेदर, आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग आणि ओमसिंग तोमर असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत.

हे चारही मुलं पोद्दार गृह संकुलातील रहिवासी होते. होळीनिमित्त धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी हे चारही मुलं आपल्या इतर मित्रांसोबत उल्हास नदीच्या काठावर आले.  ते नदीत उतरले. मात्र त्यांना नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या मुलांचा शोध घेतला. मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आलं. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  या घटनेने बदलापूर शहरात शोककळा पसरली आहे.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर 

सर्वत्र सणाचा उत्साह असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. अंगाला लागलेला रंग धुण्यासाठी ही मुलं उल्हास नदीवर गेली होती. त्यांच्यासोबत इतरही काही मुलं होती. ही मुलं नदीत उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चारही मुलांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऐन धुलिवंदनाच्या दिवशी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....