AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Utsav: महाराष्ट्रातील या मशिदीत 45 वर्षांपासून होते गणपतीची प्रतिष्ठापना, जाणून घ्या नेमकं कुठे?

Maharashtra News: महाराष्ट्रातील एका गावात 1980 पासून एक अनोखा गणेशोत्सव साजरा केला जातो. या गावातील मशिदीत गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. मुस्लिम बांधवही गणरायाची पूजा करतात. आता हे गाव कोणते जाणून घ्या...

Ganesh Utsav: महाराष्ट्रातील या मशिदीत 45 वर्षांपासून होते गणपतीची प्रतिष्ठापना, जाणून घ्या नेमकं कुठे?
Gotkhindi Ganpati celebrationImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 05, 2025 | 6:25 PM
Share

सध्या संपूर्ण राज्यात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. ठिकठिकाणी रोशनाई दिसते. गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. महाराष्ट्रातील एका गावात चार दशकांहून अधिक काळापासून एक अनोखा गणेशोत्सव साजरा होत आहे. या गावात मशिदीत गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित केली जाते. स्थानिक गणेश मंडळाचे संस्थापकांनी ‘पीटीआय’ला याबाबत सांगितले आहे. इतरत्र धार्मिक तणाव असतानाही सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावातील रहिवाशांवर त्याचा कधीच परिणाम झाला नाही असे ते म्हणाले.

सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या गावात हा अनोखा उत्सव पाहायला मिळतो. येथे गणोत्सवासाठी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी या अनोख्या गणेश उत्सवाबद्दल बोलताना सांगितले की, या गावाची लोकसंख्या सुमारे 15,000 आहे. त्यामध्ये मुस्लिम समुदायातील 100 कुटुंबांचा समावेश आहे. मुस्लिम बांधवही या मंडळाचे सदस्य आहेत. ते ‘प्रसाद’ बनवणे, पूजा-अर्चना करणे आणि उत्सवाच्या तयारीत मदत करतात.

वाचा: भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान मुंबईत तासभर का थांबवले? पुण्याला जाण्याची का हवी होती परवानगी?

1980 मध्ये सुरू झाली परंपरा

पाटील यांनी सांगितले की, ही परंपरा 1980 मध्ये सुरू झाली, जेव्हा मुसळधार पावसामुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावातील मशिदीत गणपतीची मूर्ती नेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ही परंपरा शांततेने सुरू आहे आणि त्यात मुस्लिम समुदायाचा सक्रिय सहभाग आहे. गावातील झुंझार चौकात ‘न्यू गणेश तरुण मंडळा’ची स्थापना 1980 मध्ये झाली. मूर्ती 10 दिवसांच्या उत्सवासाठी मशिदीत ठेवली जाते आणि नंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी उत्सवाच्या समारोपात स्थानिक जलाशयात विसर्जित केली जाते.

गणेश चतुर्थीला मुस्लिमांनी ‘कुर्बानी’ टाळली

पाटील यांनी सांगितले की, एकदा बकरी ईद आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आली होती. तेव्हा मुस्लिमांनी आपला सण फक्त नमाज पढण करुन साजरा केला आणि ‘कुर्बानी’ दिली नाही. त्यांनी सांगितले की, ते हिंदू सणांच्या काळात मांस खाणे टाळतात. त्यांनी सांगितले की, संपूर्ण देशाने येथील सामाजिक आणि धार्मिक सलोख्याच्या वातावरणापासून प्रेरणा घ्यावी. दरवर्षी गणेशमूर्तीच्या ‘प्राणप्रतिष्ठे’साठी स्थानिक पोलिस आणि तहसीलदार यांना आमंत्रित केले जाते.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान.
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट.
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू.
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया.
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट.
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या.
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश.
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू – निर्मला सीतारामन
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू – निर्मला सीतारामन.