AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपतीक गावाक येतास ना… चाकरमान्यांनू एसटी, रेल्वेची कुठे काय सुविधा? वाचा A टू Z माहिती

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ५००० अतिरिक्त बसेस सोडल्या आहेत. रेल्वे आणि एसटी स्थानकांवर प्रचंड गर्दी आहे. अतिरिक्त बससेवा आणि काही राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या विशेष ट्रेन सेवा यामुळे प्रवाशांना मदत होत आहे,

गणपतीक गावाक येतास ना... चाकरमान्यांनू एसटी, रेल्वेची कुठे काय सुविधा? वाचा A टू Z माहिती
ganpati konkan
| Updated on: Aug 24, 2025 | 12:13 PM
Share

कोकण आणि गणपती हे एक अनोखं नातं आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात जातात. यंदाही मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणचे अनेक कोकणी कुटुंब हे गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. येत्या २७ ऑगस्ट २०२५ रोजी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी सरकारने खास सुविधा केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५,००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी आणि रेल्वेची सोय काय?

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये मोठी गर्दी झाली आहे. विविध रेल्वे स्थानके आणि एसटी डेपोवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण दिसून येत आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. कोकणवासीयांना गावी पोहोचवण्यासाठी ५,१०३ अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. मुंबईतून तीन डेपोमधून ९७३ गाड्या कोकणासाठी रवाना होणार आहेत. यामध्ये कुर्ला डेपोतून ६९ गाड्या सोडण्यात येत आहेत. मुंबई, पनवेल, पालघर, रायगड येथून एकूण १,८०७ गाड्या सोडल्या जाणार आहेत.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा एसटीचे बुकिंग वाढले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांची देखभाल करून त्या चालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. रविवार असल्याने कुर्ला डेपोतून ७१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांनी २४ तास आधीच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मांडवी एक्सप्रेस उशिराने धावत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मोफत प्रवासाची सोय

यासोबतच अनेक राजकीय नेत्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणवासीयांसाठी विशेष गाड्यांची सोय केली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एक्सप्रेस दादर येथून दुपारी १.३० वाजता कोकणासाठी सुटणार आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनीही दादर रेल्वे स्थानकावरून मोदी एक्सप्रेस नावाची दोन विशेष ट्रेन सोडल्या आहेत. या ट्रेनच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. यात जेवण आणि पाण्याचीही व्यवस्था आहे.

नितेश राणे यांनी दादर स्थानकाबाहेर मोदी एक्सप्रेसचा डबल धमाका… चाकरमान्यांनो येतोय ना गणपतीक अशा आशयाचे बॅनर लावत मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो आहेत. ‘मोदी एक्सप्रेस’ मुळे अनेक प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मोफत सेवा मिळत असल्याने अनेक मुंबईकर आपल्या मुलाबाळांसह प्रवास करत आहेत. काही प्रवाशांनी या सेवेबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. तर काहींनी नियोजन योग्य नसल्याने तिकिटे मिळत नसल्याची तक्रार केली आहे.

खास गाड्यांची व्यवस्था

मीरा-भाईंदरमधून गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र काँग्रेसचे युवा जिल्हा अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी या गाड्यांच्या चालक आणि मालकांच्या राहण्याची सोय केलेली नाही. तसेच जेवणाची कोणतीही सोय नाही. ही योजना केवळ दिखाऊपणा आहे, असा दावा सिद्धेश राणे यांनी केला आहे.

दरम्यान गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहे. यामुळे पालघर येथे जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी शांतता समित्यांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वधर्मीय धर्मगुरूंची मते जाणून घेतली. दोन्ही सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.