AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार : खा. बापट

पुण्यात भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार किंबहुना येतील, अशी भविष्यवाणी भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार : खा. बापट
गिरीश बापट
| Updated on: Dec 29, 2020 | 6:50 AM
Share

पुणे : पुण्यात भाजपचे नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. भाजपच्या सत्ताकाळात पुण्यात विकास होत आहे. त्यामुळे येत्या 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा घौडदौड करेल. भाजपने लोकांना दिलेला विकासाचा शब्द पाळला असल्याने पुण्यात भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार किंबहुना येतील, अशी भविष्यवाणी भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली. (Girish Bapat Press Conference over Pune mahapakika Election)

पुणे महापालिकेची निवडणूक 2022 ला होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतापासून तयारीला लागलेले दिसत आहे. पुणे शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत त्यांच्याकडून विविध विकासकामांची, उभा राहिलेल्या प्रकल्पांची तसंच अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रकल्पांची माहिती बापट यांनी घेतली. या बैठकीला खा. बापट, पुणे शहर भाजपाध्यक्ष जगदिश मुळिक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे आदी नेते उपस्थित होते.

“केंद्र सरकारने पुणे शहराला गेल्या 4 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलंय. केंद्राच्या अनेक योजना शहरात सुरु आहे. तसंच तत्कालिन फडणवीस सरकारने देखील पुण्याला मोठ्या प्रमाणावर निधी दिला, असं सांगताना महाविकास आघाडीने मात्र अजिबातच निधी पुणे शहराला दिला नाही”, अशी टीका बापट यांनी केली.

“संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आलं. पुण्यातही कोरोनाने रौद्र रुप धारण केलं होतं. परंतु अशाही परिस्थितीत पुण्याचे महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या संपूर्ण नगरसेवकांच्या टीमने अतिशय उत्तम काम केलं. पुणेकरांची काळजी घेणारा महापौर लाभला, अशी स्तुती बापट यांनी केली. भाजपच्या नगरसेवकांनी गेल्या काही वर्षात मोठं सामाजिक काम केलंय”, असंही बापट म्हणाले.

“पुणेकरांच्या हिताचे निर्णय भाजपने घेतले. कराच्या दंडात सवलत देऊन महापालिकेला उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 24 तास पाणी पुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे. भामा आसखेड प्रकल्पातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन केले. यासाठी महापालिकेने 200 कोटींचा निधी दिला आहे. कोरोना संकट व्यवस्थितपणे हाताळलं. एकंदरित पुणेकरांना दिलेला शब्द पाळल्याने पुढच्या निवडणुकीत 100 पेक्षा जास्त भाजप-आरपीआयचे नगरसेवक निवडणून येतील”, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला. (Girish Bapat Press Conference over Pune mahapakika Election)

हे ही वाचा

पुणे पालिकेवर काँग्रेसचा झेंडा कसा फडकणार? वाचा बैठकीत काय घडलं?

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…!’, आठवलेंनी कविता करत उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांनी घेतली शपथ, फडणवीसांनाही टाकलं मागे

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.