AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी, अशी असणार संपूर्ण प्रक्रिया

मोठी बातमी समोर येत आहे, शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. काल शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर आज तातडीने शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी, अशी असणार संपूर्ण प्रक्रिया
Farmers Loan WaiverImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 03, 2026 | 7:10 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. काल शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर आज तातडीने शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या जीआरनुसार कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री आणि सहकार प्रधान सचिवांचा सदस्य म्हणून या समितीमध्ये सहभाग असणार आहे. दरम्यान या जीआरनुसार कर्जमाफीची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने देखील केली जाणार आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया हे सहकार निंबंधक आणि आयुक्त हे पहाणार असल्याची माहिती समोर आली आहे.  शासनाच्या या जीआरमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीने चांगलाच जोर धरला होता. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर येथे शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन देखील झालं होतं. त्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देखील देण्यात आलं. दरम्यान सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी जाहीर करणार? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते. अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. मंगळवारी कॅबिनेटमध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर आज सरकारने कर्जमाफीचा जीआर काढला आहे.

या जीआरनुसार कर्ममाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री यांचा सहभाग असणार आहे.  कर्जमाफीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने देखील होणार आहे. आधी कर्जमाफीचा निर्णय आणि आता लगेचच तातडीने कर्जमाफीचा जीआर काढण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Follow Us
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!