AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यातील एका गावात 25 वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक!

तब्बल 25 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक माहिती नसलेल्या गावात यंदा मात्र ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडणार आहे.

मराठवाड्यातील एका गावात 25 वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक!
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:23 PM
Share

औरंगाबाद: राज्यातील 14 हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते. त्यासाठी अनेकांनी लाखोंची बक्षिसंही जाहीर केली होती. त्यानुसार काही गावांनी यंदा ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात आणलाही. पण औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात 25 वर्षे बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी यंदा मात्र निवडणूक पार पडत आहे. (Gram Panchayat elections in Talani village in Aurangabad district)

औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील तळणी या गावात तब्बल 25 वर्षांनंतर निवडणूक होत आहे. गेली 25 वर्षे सातत्याने या गावात बिनविरोध सरपंच निवडून दिला जात होता. त्यामुळे गावात ग्रामपंचायतीसाठी मतदानच होत नव्हतं. तब्बल 25 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक माहिती नसलेल्या गावात यंदा मात्र ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडणार आहे. गावातील नवमतदारांनी निवडणुकीच्या माध्यमातूनच सरपंच निवडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे नवमतदारांना ग्रामपंचायत निवडणूक काय असते हे माहिती पडणार आहे.

अण्णा आणि पोपटरावांच्या गावातही यंदा निवडणूक!

आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली आहे. अण्णा आणि पवारांना बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यात अपयश आल्याने या दोघांच्याही वर्चस्वासाठी हा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळे अवघ्या 7 सदस्यांच्या या ग्रामपंचायतीची प्रत्येकवेळी बिनविरोध निवडणूक होत होती. पोपटराव पवार सांगतील तसे गावकरी वागत होते. मात्र, यंदा ही परंपरा प्रथमच खंडित झाली असून सातही जागांसाठी निवडणूक होणार आहे. हिवरे बाजारमध्ये 1989 पासून सलग सहावेळा बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यामुळे आता 30 वर्षानंतर हिवरे बाजारमध्ये निवडणुका होत असून पवार यांच्या विरोधात परिवर्तन ग्रामविकास पॅनल मैदानात उतरले आहे.

अण्णा आणि लंकेना अपयश

राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आमदार निलेश लंके यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यांच्या या मोहिमेला यशही आले होते. गावकऱ्यांची बैठक घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी माशी शिंकली असून अण्णा आणि लंके यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. त्यामुळे राळेगणमध्ये निवडणूक होणार आहे.

संबंधित बातम्या:

70 वर्षांच्या आजी थेट निवडणुकीच्या रिंगणात, गाव पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार

ग्रामपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली; आता प्रचाराचं धुमशान!

Gram Panchayat elections in Talani village in Aurangabad district

Follow Us
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.