AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राज ठाकरेंना ‘ती’ गोष्ट समजत नाही..’, गंगेबद्दलच्या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्ते संतापले

राज ठाकरे यांनी आज मनसेच्या कार्यक्रमात बोलताना महाकुंभ मेळ्यातील एक किस्सा सांगितला, त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'राज ठाकरेंना 'ती' गोष्ट समजत नाही..', गंगेबद्दलच्या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्ते संतापले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2025 | 6:12 PM
Share

यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा झाला, बड्या-बड्या राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रयागराजला जाऊन महाकुंभादरम्यान गंगेमध्ये अंघोळ केली. कोट्यवधी भाविक महाकुंभ मेळ्यासाठी आले होते. मात्र त्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्यावरून निशाणा साधला आहे. तसेच श्रद्धा, अधंश्रद्धेतून बाहेर पडा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला, ते मनसेच्या वर्धापण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चिंचवड येथे बोलत होते. दरम्यान राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

मला वाटतं राज ठाकरेंना आता स्पष्ट करावं लागेल की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे की नाही? त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना जाऊन विचारलं पाहिजे, राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय आहे? राज ठाकरे यांना भारतीय संविधानाने दिलेला श्रद्धेचा मूळ अधिकार समजत नसेल. गंगा हा विषय लोकांच्या श्रद्धेसोबत जोडला गेला आहे. राज ठाकरे यांनी गंगा मातेचा अपमान केला आहे. राज ठाकरेंची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. ते जेव्हा बोलत होते तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. राज ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी नाही, असं हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

 राज ठाकरे काय म्हणाले? 

राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याचा एक किस्सा सांगितला. मुंबईमध्ये एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये अनेकांनी वेगवेगळी कारणं दिली, कोणी म्हटलं घरचे आजारी होते, पाच-साह जण म्हणाले आम्ही कुंभमेळ्याला गेलो होतो. मग मी त्यांना म्हणालो गधड्यांनो पाप कशाला करता, हेही विचारलं आल्यावर अंघोळ केली ना? आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले, पण मी त्यांना म्हटलं हड.. मी नाही पिणार पाणी, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांनी यावेळी श्रद्धा, अधंश्रद्धेतून बाहेर पडा असा सल्लाही दिला आहे, यावरून आता राज ठाकरे यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...