AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

105 आमदारांना घरी बसवून उद्धव ठाकरेंनी दम दाखवून दिला; हसन मुश्रीफ यांचा घणाघात

'तुमच्यात सरकार चालवण्याचा दम नाही. म्हणूनच तुम्ही रडत बसत बसले असून तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत करणार?,' विरोधकांनी केलेल्या या टीकेचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला आहे.

105 आमदारांना घरी बसवून उद्धव ठाकरेंनी दम दाखवून दिला; हसन मुश्रीफ यांचा घणाघात
| Updated on: Oct 20, 2020 | 8:21 PM
Share

कोल्हापूर: ‘तुमच्यात सरकार चालवण्याचा दम नाही. म्हणूनच तुम्ही रडत बसत बसले असून तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत करणार?,’ विरोधकांनी केलेल्या या टीकेचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला आहे. भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात काय दम आहे हे दाखवून दिलं आहे, असं टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. (hasan mushrif taunts bjp over criticized uddhav thackeray)

हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. भाजपच्या 105 आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी बसवले. त्यांनी त्यांचा दम दाखवून दिला, असं सांगतानाच कोरोना संकट आणि नैसर्गिक संकटावर मुख्यमंत्र्यानी ज्या पद्धतीने मात दिलीय. ते दम असल्याशिवाय नाही, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला. सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अस्वस्थ जाले आहेत. त्यामुळे ते रोज टीका करत आहेत. त्यांनी थोडा संयम ठेवला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

काय म्हणाले होते दरेकर?

“माझं कुटुंब, माझी जबाबदारी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात. पण आता फक्त भावनिक आवाहन करुन चालणार नाही. काम करायला हवं. सरकार चालवण्याचा जर दम नसेल, तुम्ही रडत बसणार तर मग शेतकऱ्याला काय मदत करणार?”, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता.

“सत्ताधारी फक्त महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काम करत आहेत. राजकारण भोवतीच हे फिरतात. डोळ्याने शेती उद्ध्वस्त झालेली दिसते आहे. त्यांनी फोटोच्याआधारे सरसकट मदत करावी”, असं दरेकर म्हणाले होते.

“राज्य सरकार केंद्राने मदत करावी म्हणत केंद्राकडे बोट दाखवत आहे. नाचता येई ना आंगन वाकडे, अशी गोष्ट आहे. पण केंद्राकडे बोट दाखवत स्वतःची जबाबदारी टाळता येणार नाही. वाद निर्माण करायचा आणि मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं, अशी या सरकारच्या कामाची पद्धत आहे”, अशी टीकाही त्यांनी केली होती. (hasan mushrif taunts bjp over criticized uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

तुमच्यात सरकार चालवण्याचा दम नसेल, तुम्ही रडत बसणार तर शेतकऱ्याला काय मदत करणार? : प्रवीण दरेकर

ठाकरे सरकार म्हणजे बदमाशांचं सरकार, आशिष शेलारांचा हल्लाबोल

(hasan mushrif taunts bjp over criticized uddhav thackeray)

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर