AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : नाशकात पावसाची तुफान बॅटींग, खरिपाला पोषक वातावरण, उर्वरित महाराष्ट्राची प्रतिक्षा कायम..!

रब्बी हंगामातील पिकांची काढणी होताच शेतकऱ्यांनी खरिपासाठी क्षेत्र तयार करण्यास सुरवात केली होती. यातच यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे उरकून घेतली होती. यातच रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.

Rain : नाशकात पावसाची तुफान बॅटींग, खरिपाला पोषक वातावरण, उर्वरित महाराष्ट्राची प्रतिक्षा कायम..!
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. जोगोजागी पाणी साचले होते.
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 10:36 AM
Share

नाशिक : यंदा वेळेपूर्वीच (Monsoon) मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे शेती मशागतीची कामे आटोपून बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले असतानाच (Nashik) नाशिक जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटींग केली आहे. वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये शेत – शिवारात पाणीच पाणी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे उशिरा का होईना दणक्यात पाऊस झाल्याने आता खरीप हंगामातील कामांना अधिक वेग येणार आहे. नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यात जागोजागी पाणी साचल्याचे पाहवयास मिळाले असून नाशिककरांना उकाड्यापासूनही दिलासा मिळाला आहे. पावसामध्ये सातत्य राहिल्यास लवकरच खरीप हंगामातील पेरण्यांना सुरवात होणार आहे. पावसामुळे अल्हादायक वातावरण निर्माण झाले आहे.

शेती मशागत होताच पावसाची हजेरी

रब्बी हंगामातील पिकांची काढणी होताच शेतकऱ्यांनी खरिपासाठी क्षेत्र तयार करण्यास सुरवात केली होती. यातच यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे उरकून घेतली होती. यातच रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मशागत उपयोगी आली असून आता पावासामध्ये सातत्या राहिल्यास शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवणार यामध्ये शंका नाही.

राज्यात तुरळक ठिकाणीच वरुणराजाची कृपादृष्टी

7 जून उजाडला तरी राज्यात सर्वत्र पाऊस झालेला नाही. मध्यंतरी मराठवाड्यातील लातूर, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. गत आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, बार्शी या ठिकाणी झालेल्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, अद्यापही पाऊस हा सक्रीय झालेला नाही. तुरळक ठिकाणीच तो बरसत असून पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकरीही संभ्रमात आहे. मात्र, उत्तर भारतामध्ये रविवारी पाऊस झाल्याने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

खरिपाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण

यंदा मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन होणार असल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे वेळेत पूर्ण केली होती. सध्याही पेरणीला उशिर झाला नसला तरी आता पावसाने सर्वदूर हजेरी लावली तर सर्वकाही वेळेत होणार आहे. अन्यथा गतवर्षी सारखे अंतिम टप्प्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली तर खरिपाते होत्याचे नव्हते होते. त्यामुळे नाशकाप्रमाणे राज्यात सर्वदूर पाऊस झाला तर शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्यास तयार राहणार आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.