AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Alert : महाराष्ट्रासह सहा राज्यांत पावसाचे थैमान; मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट

रविवारी पूर्व विदर्भात मराठवाड्यातील अकोला, नागपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सोमवारीही उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील घाट संकुलात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पालघर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Monsoon Alert : महाराष्ट्रासह सहा राज्यांत पावसाचे थैमान; मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट
| Updated on: Jul 24, 2022 | 11:50 PM
Share

पुणे : महाराष्ट्रासह(Maharashtra) सहा राज्यांत पावसाने(Heavy rains) थैमान घातले आहे. त्यातच आता मराठवाडा(Marathwada), विदर्भात(Vidarbha) यलो अलर्ट(Yellow alert) जारी करण्यात आला अआहे. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात पाऊस झाल्यानंतर हवामान खात्याने दोन्ही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, उत्तर कोकणातील पालघरसह नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यानंतर पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

रविवारी पूर्व विदर्भात मराठवाड्यातील अकोला, नागपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सोमवारीही उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील घाट संकुलात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पालघर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

दरम्यान, मान्सून संपूर्ण देशात व्यापला असून जवळपास प्रत्येक राज्यात पावसाला प्रारंभ झाला आहे. आसाम, गुजरात, उत्तराखंडसह अनेक राज्यात पावसाने थैमान घातलेय.

गुजरात पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे गुजरात पाण्याखाली गेले आहे. राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मेहसाणा येथे काही तासांतच रस्त्यांवर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचल्याचे दृश्य रविवारी पहायला मिळाले. सूरत, नवसारी, वलसाड, डांग आणि तापी येथील 5 जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस पडत होता. 7जुलैपासून राज्यात झालेल्या विविध घटनांमध्ये कमीत कमी 70 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमध्ये पावसाचा जोर वाढला

उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. या तीनही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.रविवारी गुजरात, राजस्थान, पूर्व मध्यप्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने थैमान घातले. रायपूर आणि छत्तीसगडमध्ये अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेय. पुढील चार ते पाच दिवसांत मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.