AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही एक विद्यार्थी दगावला, हिंगोलीत अपघातांची मालिका, वाहन चालकांवर वचक कधी बसणार?

हिंगोलीत मागील दोन दिवसात भीषण अपघात झाले असून यात शाळकरी विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेलाय. भरधाव वेगाने वाहन दामटणाऱ्या चालकांना मात्र त्याचं सोयरसुतक नाही आणि पोलिसांचा वचकही नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जातोय.

आजही एक विद्यार्थी दगावला, हिंगोलीत अपघातांची मालिका, वाहन चालकांवर वचक कधी बसणार?
हिंगोलीत रस्ते अपघातात शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 20, 2021 | 5:32 PM
Share

हिंगोलीः शाळा आणि महाविद्यालयं ऑफलाइन पद्धतीने सुरु झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे चित्र असले तरी हिंगोली जिल्ह्यात मात्र मागील दोन दिवसांच्या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसात वेगवेगळ्या तीन अपघातांत (Accident) तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रस्त्यावरून वाहने चालवणारे नागरिके बेदरकारपणे वाहने दामटवत असल्यानेच मुलांचे बळी गेल्याचा आरोप नागरिक करतायत. तसेच नागरिकांवर पोलिसांचा वचक आहे की नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे.

वसमतमध्ये 11 वर्षीय विद्यार्थी ट्रकखाली सापडला

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे 11 वर्षीय मुलगा शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलांडत होता. मात्र रस्त्यावरील भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अपघात झाला. या घटनेत या चिमुरड्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सेनगाव तालुक्यातील जांभरून येथील हरिभाऊ जुंमडे ह्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जीप व दुचाकी अपघात मृत्यू झालाय.

सावरखेड्यात 10 वर्षीय बालकाचा मृत्यू

तर आज हिंगोली तालुक्यातील सावरखेडा गावचा 10 वर्षीय बालक रस्ता ओलाडून भोजनासाठी जात होता. त्याला बलोनो कारने चिरडल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. या तीन ही घटनात वाहन धारक बेकदरपणे सुसाट वाहने पळवीत होते अशी माहिती आहे. दरवर्षी पोलीस रस्ता सुरक्षा अभियान राबवत असतात पण वर्षभर मात्र पोलिसांना रस्ता सुरक्षा अभियानाचा विसर पडतोय, असंच वाढत्या अपघाताच्या घटनावरून दिसून येते.

इतर बातम्या-

‘परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधण्याची गरज’, दरेकरांकडून सीबीआय चौकशीची मागणी

गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, हेमा मालीनींच्या गालाच्या वक्तव्याने वादात

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक