AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय, अखेर विधानसभेत मोठी घोषणा

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, आज विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आली, लाखो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

मोठी बातमी! राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय, अखेर विधानसभेत मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2025 | 8:05 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, आज राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तुकडा बंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत विधानसभेत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. लवकरच या संदर्भात एक एसओपी तयार करण्यात येणार आहे.

नेमकं काय म्हणाले बावनकुळे? 

तुकडे बंदी कायदा आम्ही रद्द करत आहोत, लवकरच आम्ही त्या संदर्भातील नोटिफिकेश आम्ही काढणार आहोत, लवकरच या कायद्यामध्ये आम्ही बदल करणार आहोत. आम्ही या कायद्यासंदर्भातील सर्व बंधण मुक्त करत आहोत, लवकरच आम्ही एक एसओपी या संदर्भात जारी करू, ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोप होईल, त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना दिलासा 

पावसाळी अधिवेशन सुरू आहे, याचदरम्यान सरकारनं आता मोठा निर्णय घेतला आहे. तुकडा बंदी कयदा रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली. आम्ही या कायद्यासंदर्भातील सर्व बंधणं मुक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान हा कायदा रद्द झाल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सुरू होती. अखेर हा कायदा आता सरकारने रद्द केला आहे. विधानसभेत या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात घोषणा करताना लवकरच आम्ही एक एसओपी या संदर्भात जारी करू, ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोप होईल, त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

काय आहे तुकडा बंदी कायदा?

तुकडा बंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यात प्रतिबंध होता, एक, दोन, तीन अशी गुंठ्यामध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करता येत नव्हती, मात्र आता हे निर्बंध हटवले जाणार आहेत.

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.