Heat Wave : मध्य महाराष्ट्रासह राज्यात उष्णतेची लाट, चार दिवस उन्हाचे चटके, चंद्रपुरात रेकॉर्डब्रेक तापमान

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात पुढील तीन ते चार दिवसात राज्यात उष्णतेची (Heat Wave) लाट येऊ शकते , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Heat Wave : मध्य महाराष्ट्रासह राज्यात उष्णतेची लाट, चार दिवस उन्हाचे चटके, चंद्रपुरात रेकॉर्डब्रेक तापमान
temperatureImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 4:21 PM

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून राज्यात पुढील तीन ते चार दिवसात राज्यात उष्णतेची  लाट (Heat Wave) येऊ शकते , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30,31 मार्च आणि 1 ते 3 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला आहे. हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरत असल्याचं समोर येत असून मार्च महिन्यात तापमान 40 अंशाच्या पुढं गेलं आहे. पुढील तीन चे चार दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील तापमान वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान 43.4 अंशावर पोहोचलं होतं. चंद्रपूर हे जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे.

प्रादेशिक हवामान विभागाचं ट्विट

कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवणार?

30 मार्च : अहमदगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर

31 मार्च : अहमदनगर, सोलापूर, जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव

1 एप्रिल : जळगाव, बुलडाणा, अकोला, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अहमदनगर आणि सोलापूर

2 एप्रिल : बुलडाणा, जालना, परभणी, हिंगोली आणि अकोला

एएनआय या वृत्तसंस्थेचं ट्विट

चंद्रपूरमध्ये सूर्य कोपला, 43.4 अंश तापमानाची नोंद

चंद्रपुरात सूर्य कोपल्याचे चित्र आहे. आज जगातील तिसऱ्या उष्ण शहरात चंद्रपूरचा समावेश झालाय. मंगळवारी चंद्रपुरात 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. देशाच्या उत्तर भागातून येणारे उष्ण वारे या अचानक तापमानवाढीस कारण ठरले आहेत. यामुळे राज्यातील हवामान अति उष्णतेकडे जाण्याची शक्यता आहे. विदर्भातील शहरे अधिक तापमानाची होऊ लागली आहेत. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील तापमान देखील 40 अंशाच्या वर गेलं आहे.

उष्णतेची लाट कायम राहणार

भारतीय हवामान विभागाचे नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ आर के जेनमानी यांनी नवी दिल्लीतील तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याची माहिती दिली. 1 ते 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहिल. मध्य भारत आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवेल, असं जेनमानी यांनी म्हटलंय. 2 एप्रिल नंतर तापमान कमी होईल, असं त्यांनी म्हटलंय.

इतर बातम्या:

UP Board 2022 : उत्तर प्रदेशात बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला, 500 रुपयांना विक्री, 24 जिल्ह्यात परीक्षा रद्द

त्यांना बेघर होऊ देऊ नका, रेल्वेमार्गालगच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा-मनोज कोटक

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.