AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heat Wave : मध्य महाराष्ट्रासह राज्यात उष्णतेची लाट, चार दिवस उन्हाचे चटके, चंद्रपुरात रेकॉर्डब्रेक तापमान

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात पुढील तीन ते चार दिवसात राज्यात उष्णतेची (Heat Wave) लाट येऊ शकते , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Heat Wave : मध्य महाराष्ट्रासह राज्यात उष्णतेची लाट, चार दिवस उन्हाचे चटके, चंद्रपुरात रेकॉर्डब्रेक तापमान
temperatureImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 4:21 PM
Share

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून राज्यात पुढील तीन ते चार दिवसात राज्यात उष्णतेची  लाट (Heat Wave) येऊ शकते , असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30,31 मार्च आणि 1 ते 3 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला आहे. हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरत असल्याचं समोर येत असून मार्च महिन्यात तापमान 40 अंशाच्या पुढं गेलं आहे. पुढील तीन चे चार दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील तापमान वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान 43.4 अंशावर पोहोचलं होतं. चंद्रपूर हे जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे.

प्रादेशिक हवामान विभागाचं ट्विट

कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवणार?

30 मार्च : अहमदगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर

31 मार्च : अहमदनगर, सोलापूर, जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव

1 एप्रिल : जळगाव, बुलडाणा, अकोला, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अहमदनगर आणि सोलापूर

2 एप्रिल : बुलडाणा, जालना, परभणी, हिंगोली आणि अकोला

एएनआय या वृत्तसंस्थेचं ट्विट

चंद्रपूरमध्ये सूर्य कोपला, 43.4 अंश तापमानाची नोंद

चंद्रपुरात सूर्य कोपल्याचे चित्र आहे. आज जगातील तिसऱ्या उष्ण शहरात चंद्रपूरचा समावेश झालाय. मंगळवारी चंद्रपुरात 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. देशाच्या उत्तर भागातून येणारे उष्ण वारे या अचानक तापमानवाढीस कारण ठरले आहेत. यामुळे राज्यातील हवामान अति उष्णतेकडे जाण्याची शक्यता आहे. विदर्भातील शहरे अधिक तापमानाची होऊ लागली आहेत. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील तापमान देखील 40 अंशाच्या वर गेलं आहे.

उष्णतेची लाट कायम राहणार

भारतीय हवामान विभागाचे नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ आर के जेनमानी यांनी नवी दिल्लीतील तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याची माहिती दिली. 1 ते 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहिल. मध्य भारत आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवेल, असं जेनमानी यांनी म्हटलंय. 2 एप्रिल नंतर तापमान कमी होईल, असं त्यांनी म्हटलंय.

इतर बातम्या:

UP Board 2022 : उत्तर प्रदेशात बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला, 500 रुपयांना विक्री, 24 जिल्ह्यात परीक्षा रद्द

त्यांना बेघर होऊ देऊ नका, रेल्वेमार्गालगच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा-मनोज कोटक

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.