AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hit Wave Alert : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला ‘या’ तीन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Hit Wave Alert : आता हवामान विभागाने पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ जाणवली होती. नवी मुंबई सह इतर ठिकाणी तर पारा 41 अंशावर गेला होता.

Hit Wave Alert : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला 'या' तीन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा
Hit Wave
| Edited By: | Updated on: May 09, 2024 | 3:20 PM
Share

महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. सध्या उन्हाळा सुरु असून 10-15 मिनिट चालल्यानंतर अंग घामाने भिजून निघतय. उष्णतेमुळे अंगाची काहिली होतेय. त्यामुळे सकाळ-दुपारच्यावेळी शक्यतो लोक घराबाहेर पडण्याच टाळत आहेत. त्यात आता हवामान विभागाने पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसात तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या झळा बसतील. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये चक्रीय वात विरोधी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे 27 आणि 28 एप्रिल या दोन दिवसात तापमानात वाढ होऊ शकते, असं हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी माहिती दिली आहे. मुंबईसाठी दुसऱ्यांदा हा इशारा देण्यात आला असून याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ जाणवली होती. नवी मुंबई सह इतर ठिकाणी तर पारा 41 अंशावर गेला होता. मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने काय सल्ला दिलाय?

हवामान विभागाने नागरिकांना दीर्घकाळ उन्हात रहाण टाळा असा सल्ला दिला आहे. पुरसे पाणी प्या, सैल कॉटनचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. दुपारच्यावेळी घराबाहेर पडताना चेहरा झाकून घ्या. टोपी घाला, छत्री वापरा असा सल्ला दिला आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.