AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hit Wave Alert : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला ‘या’ तीन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Hit Wave Alert : आता हवामान विभागाने पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ जाणवली होती. नवी मुंबई सह इतर ठिकाणी तर पारा 41 अंशावर गेला होता.

Hit Wave Alert : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला 'या' तीन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा
Hit Wave
| Edited By: | Updated on: May 09, 2024 | 3:20 PM
Share

महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. सध्या उन्हाळा सुरु असून 10-15 मिनिट चालल्यानंतर अंग घामाने भिजून निघतय. उष्णतेमुळे अंगाची काहिली होतेय. त्यामुळे सकाळ-दुपारच्यावेळी शक्यतो लोक घराबाहेर पडण्याच टाळत आहेत. त्यात आता हवामान विभागाने पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसात तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या झळा बसतील. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये चक्रीय वात विरोधी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे 27 आणि 28 एप्रिल या दोन दिवसात तापमानात वाढ होऊ शकते, असं हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी माहिती दिली आहे. मुंबईसाठी दुसऱ्यांदा हा इशारा देण्यात आला असून याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ जाणवली होती. नवी मुंबई सह इतर ठिकाणी तर पारा 41 अंशावर गेला होता. मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने काय सल्ला दिलाय?

हवामान विभागाने नागरिकांना दीर्घकाळ उन्हात रहाण टाळा असा सल्ला दिला आहे. पुरसे पाणी प्या, सैल कॉटनचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. दुपारच्यावेळी घराबाहेर पडताना चेहरा झाकून घ्या. टोपी घाला, छत्री वापरा असा सल्ला दिला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.