AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD चा नवा अंदाज आला, 5 दिवस राज्याच्या या भागाला पाऊस झोडपणार, अलर्ट जारी

IMD Maharashtra Rain Alert : हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्याच्या काही भागात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

IMD चा नवा अंदाज आला, 5 दिवस राज्याच्या या भागाला पाऊस झोडपणार, अलर्ट जारी
IMD Vidarbha Rain AlertImage Credit source: Google
| Updated on: Jun 29, 2026 | 5:48 PM
Share

संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्याच्या काही भागात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसा पाऊस असेल याबाबत माहिती जाणून घेऊयात.

5 दिवस विदर्भासाठी महत्त्वाचे

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी सांगितले की, विदर्भात तीन ते सात जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या खाडीत एक सिस्टम डेव्हलप होत आहे, त्यामुळे विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे. मात्र 3 तारखे पर्यंत काही भागात हलका तर काही भागात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जून महिन्यात कमी पाऊस

प्रवीण कुमार यांनी पुढे बोलताना सांगितले की, जून महिन्यात विदर्भात पाऊस पडला नसल्याने 50 टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर 70 ते 80 टक्के पावसाची तूट आणि नागपूर जिल्ह्यात जवळपास 45 टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. ही तूट लवकर भरून निघण्याची शक्यता कमी असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

जळगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

जळगावमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळला, या पावसामुळे रस्त्यावर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शहरातील नवी पेठ भागामध्ये तासाभराच्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी साचलं आहे. या साचलेल्या पाण्यामधूनच वाहनधारकांना वाट काढावी लागत असून मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या साचलेलं पाणी जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने दुकानांच्या पायऱ्यापर्यंत पावसाचे पाणी पोहोचलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागातील नागरिकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित ही पाणी साचण्याची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ