AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा

देशासह राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, इस्त्रोच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या नव्या छायाचित्रांमुळे मोठी खळबळ उडाली आहे, देशाच्या तब्बल दोन तृतियांश भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यात आहे.

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा
imd Monsoon updateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 19, 2026 | 3:43 PM
Share

इस्रोच्या INSAT-3DR सॅटेलाईटने भारताच्या हवामानातील मोठा बदल समोर आणला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून देखील देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाचा जवळपास दोन तृतियांश भाग हा ढगांनी व्यापून गेला आहे. जम्मू काश्मीरपासून ते गंगा नदीच्या मैदानी प्रदेशापर्यंतचा भाग ढगांनी व्यापून टाकला आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये मान्सूनच्या ढगांनी गर्दी केली आहे. मान्सून भारतामध्ये आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काही राज्यात तर अतिवृष्टीची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून सातत्याने या निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

इस्त्रोच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या नव्या फोटोंमुळे मोठी खळबळ उडाली आहे. भारताचा जवळपास 60 ते 70 टक्के भाग मान्सूनच्या ढगांनी व्यापून टाकला आहे. याचाच अर्थ पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये देशातील जवळपास दोन तृतियांश भागांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

हवामान बदलाचा परिणाम

हवामान तज्ज्ञाच्या मते गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठा बदल होत आहे. कधी-कधी अतिमुसळधार पाऊस होतो तर कधी-कधी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं, असं देखील नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, नाशिक, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन