AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात आला, पण पडायचं नावच नाही, कुठे रेंगाळला पाऊस? यंदा देशात फक्त… का ओढावलं असं संकट?

महाराष्ट्रात जून महिन्यात धो धो पडणारा पाऊस अजून कसा पडला नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यंदाच्या वर्षी पाऊस महाराष्ट्रा येऊन थांबला आहे... तर देशात 41 % कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलं आहे... असं संकट का उभं राहली याची प्रमुख 5 कारणे

महाराष्ट्रात आला, पण पडायचं नावच नाही, कुठे रेंगाळला पाऊस? यंदा देशात फक्त... का ओढावलं असं संकट?
| Updated on: Jun 19, 2026 | 12:01 PM
Share

दिवसाणिक उकाडा वाढत आहे, त्यामुळे राज्यात प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य आहे आणि तो म्हणजे ‘पाऊस पडेल तरी काधी?’, सध्याची परिस्थिती पाहिली तर, लहान मुलंच नाही तर, मोठे देखील पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पण पाऊस कधी बरसेल आहे, राज्यातील नागरिकांना दिलासा मिळेल… याबद्दल काहीही सांगता येत नाही. पाऊस महाराष्ट्राच्या दक्षिण भागात येऊन रेंगाळला आहे… याच कारणामुळे देशभरात 41 टक्के कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे… भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या आकडेवारीनुसार, 4 जून ते 18 जून या कालावधीत देशात केवळ 42.6 मिमी पावसाची नोंद झाली, तर या काळात सामान्यतः 72.2 मिमी पाऊस पडणं अपेक्षित असतं.

महाराष्ट्रात रेंगाळला पाऊस

हवामान विभागाने (IMD) गुरुवारी सांगितल्यानुसार, मोठ्या प्रमाणात अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे पाऊस गेल्या काही दिवसांपासून पुढे येऊ शकलेलाच नाही… मान्सूनच्या आदमनाचा वेग मंद असण्यामागे पाच मुख्य कारणं हवामान विभागाने सांगितली गेली आहेत.

पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, अरबी समुद्रातून निर्माण होणाऱ्या वादळी लाटांचा अभाव. अशा लाटा सहसा मोठ्या प्रमाणात आर्द्रता घेऊन येतात आणि व्यापक पाऊस पाडतात, ज्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होते. दुसरे कारण म्हणजे अरबी समुद्रावर मान्सूनशी संबंधित नैऋत्येकडील वारे कमकुवत झाले आहेत. तिसरं कारण म्हणजे पश्चिम हिंदी महासागर आणि अरबी समुद्रावर विषुववृत्त ओलांडून येणारे वारे कमकुवत आहेत. हे वारे मान्सूनसाठी आर्द्रतेचा स्रोत आहेत.

हवामान विभागाच्या मते, मान्सून कमकुवत होण्याचं चौथं कारण म्हणजे त्याला पुढे नेण्यास मदत करणारे महत्त्वाचे घटक, म्हणजे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाबांचे पट्टे यांचा अभाव आहे. तर, याचा शेत कामांना देखील मोठा फटका बसणार आहे. कमी पाऊस असल्याचा खरीप पिकांवर गंभीर परिणाम होण्याची भीती देखील वर्तवण्यात येत आहे.

पाचवं कारण म्हणजे ‘मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन’ (MJO) कमकुवत होणं. MJO ही वारा, ढग आणि हवेचा दाब यांची एक गतिशील प्रणाली आहे, जी विषुववृत्ताभोवती फिरताना पाऊस घेऊन येते. जेव्हा MJO जेव्हा सक्रिय होतो, तेव्हा तो, दक्षिण भारतात अधिक ढगाळ वातावरण निर्माण करतो… त्यानंतर, मान्सूनचे वारे हे ढग उत्तरेकडे वाहून नेतात, ज्यामुळे पावसाचं प्रमाण वाढतं.

मान्सूनची रखडलेली प्रगती आणि नुकताच निर्माण झालेली ‘एल निनो’ची स्थिती यामुळे पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. ‘एल निनो’ ही हवामानाशी संबंधित एक अशी घटना आहे, जी भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण ती मान्सूनला कमकुवत करते. याचा खरीप पिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण या पिकांच्या चांगल्या वाढीसाठी वेळेवर पाऊस पडणं आवश्यक असते. कमी पाऊस झाल्यास भविष्यात पाणी टंचाईचा देखील सामना करावा लागू शकतो…

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!