AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : पुढील 4 दिवस धोक्याचे; मुंबईपासून नागपूरपर्यंत सगळीकडे पावसाचा अलर्ट जारी

गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. मात्र आता राज्यात पाऊस पुन्हा परतणार आहे. आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD Weather Update : पुढील 4 दिवस धोक्याचे; मुंबईपासून नागपूरपर्यंत सगळीकडे पावसाचा अलर्ट जारी
Rain Alert in Maharashtra
| Updated on: Aug 25, 2025 | 10:02 PM
Share

राज्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला होता, मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. मात्र आता राज्यात पाऊस पुन्हा परतणार आहे. आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

29 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सामान्य होते. सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला. आता असाच पाऊस पाऊस 29 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणाला यलो अलर्ट जारी

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आजपासून दक्षिण कोकणात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच मंगळवार आणि बुधवारी उत्तर कोकणात म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील या भागाला पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात मॅडेन ज्युलियन ऑसिलेशनच्या प्रवेशामुळे ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान कोकण आणि गोव्यात, तसेच 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच कालावधील गुजरातमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गुजरातमधील या पावसामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रातील हवामानावर परिणान होण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!