AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रक ड्रायव्हरच्या संपामुळे महागाई वाढण्याची शक्यता; 3 दिवसात 450 कोटींचं नुकसान होणार?

Maharashtra Truck Driver Strike For New Motor Vehicle Act : नवीन मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरू आहे. देशभर याचे पडसाद उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटले आहेत. अशातच ट्र चालकांच्या संपामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प आहे. याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे.

ट्रक ड्रायव्हरच्या संपामुळे महागाई वाढण्याची शक्यता; 3 दिवसात 450 कोटींचं नुकसान होणार?
| Updated on: Jan 02, 2024 | 3:35 PM
Share

मुंबई | 02 डिसेंबर 2024 : एखादा संप जेव्हा पुकारला जातो. तेव्हा त्याचा परिणाम केवळ कोणत्या एखाद्या क्षेत्रापुरता मर्यादित नसतो. जेव्हा समाजातील एखादा मोठा घटक संप पुकारतो. तेव्हा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर त्याचा दुरगामी परिणाम होतो. महाराष्ट्रासह देशभरात ट्रक चालकांचा संपावर गेलेत. नवीन मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरू आहे. या संपाचे परिणाम तुमच्या आमच्या जीवनावर होत आहे. या संपाचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे. देशातील जनतेला महागाईचा सामना करायला लागू शकतो.

महागाईचा फटका बसणार?

देशभरातील ट्रक चालकांनी तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. जर हा संप असाच सुरु राहिला तर त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होऊ शकतो. मुंबईत दररोज 1.20 लाख ट्रक आणि कंटेनर्स येत असतात. पण हा बंद पुकारण्यात आल्याने आज माल वाहतूक करणारे ट्रक आणि टँकर मुंबईत येऊ शकलेले नाहीत. वस्तूंचा पुरवठा कमी झाल्याने वस्तूंच्या किमती वाढू शकतात. तीन दिवसांच्या या संपामुळे साडे चार कोटींचं नुकसान होऊ शकतं.

कोट्यावधींचं नुकसान होण्याची शक्यता

एक दिवस ट्रक चालकांनी संप केला तर 120 ते 150 कोटींच्या व्यावसायावर परिणाम होत आहे. तीन दिवसांचा हिशोब केला तर 450 कोटींच्या व्यावसायाला या संपाचा फटका बसू शकतो. याचा सर्वाधिक परिणाम पेट्रोल आणि डिझेलवर होऊ शकतो. तसंच दूथ, फळं , भाज्या यांचा तुटवडा जाणवू शकतो. शिवाय त्याच्या किमतीही वाढू शकतात.

महाराष्ट्रात ट्रक चालकांचा संप

महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी संप पुकारण्यात आला आहे. नवीन मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरू आहे. यामुळे निर्माण होणारा तुटवडा लक्षात घेता नागरिकांनी अनेक ठिकाणी पेट्रोलपंपवर गर्दी केली आहे. पुणे, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, रत्नागिरी, मनमाड, अहमदनगर, नाशिक या शहरांमध्ये पेट्रोल पंपवर लोकांनी गर्दी केली आहे. पेट्रोल पंपाच्या बाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे. पेट्रोल मिळत नसल्याने वाहन चालक व्यथित झाले आहेत. शहरांतील पेट्रोल पंपावर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.