AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain Alert : रात्री 12 वाजल्यापासून मुंबई-ठाण्यात पुन्हा पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, वाहतुक कोंडी, मुंबईकरांची प्रचंड दमछाक

Mumbai Rain Alert : भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला. पुणे, रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला.

Mumbai Rain Alert : रात्री 12 वाजल्यापासून मुंबई-ठाण्यात पुन्हा पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, वाहतुक कोंडी, मुंबईकरांची प्रचंड दमछाक
Mumbai Rain Alert
| Updated on: Jul 03, 2026 | 10:59 AM
Share

Mumbai Rain Alert : राज्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. मुंबईमध्ये तर सतत पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. आज भारतीय हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून थांबण्याचे नाव घेत नाही. नुकताच मंत्रालयाकडून मुंबईसह उपनगरे, पालघर आणि ठाण्यात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा पुढील 3 तासांसाठी दिला आहे. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. अंधेरीचा सबवे बंद आहे. पूर्ण पाणी तिथे साचले आहे. काल अनेक भागात झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. दक्षिण मुंबई परिसरात जोरदार पावसाला सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. प्रशासनाने मुंबईकरांना अतिमहत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

ठाण्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून पावसाची संतातधार सुरु होती. काल रात्री 12 वाजल्या पासून 26 मिलिमिटर पावसाची नोंद झाली तर दिवसभरात 84 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. आज दिवसभर ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी परिसरात अनेक भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

वांद्रेतील कलानगर परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विविध भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल रात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम अंधेरी सबवेमध्ये दिसून येत आहे. पाणी निचरले की, पुन्हा अंधेरी सबवे सुरू करण्यात येईल.

दुसरीकडे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने केला. कोकणात तर पावसाचा धुमाकूळ बघायला मिळतोय. पुढील काही दिवस पाऊस अशाचप्रकारे सुरू राहण्याचा अंदाज आहे. पुढील 4 दिवसांकरिता पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला. राज्यात पावसाचा जोर वाढत आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा