AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर मोठं संकट, 5 जिल्ह्यांना थेट इशारा, घराच्या बाहेर पडणे टाळा, पुढील 24 तास…

Maharashtra Rain Update : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर बघायला मिळतोय. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिलाय. आज काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यावर मोठं संकट, 5 जिल्ह्यांना थेट इशारा, घराच्या बाहेर पडणे टाळा, पुढील 24 तास...
Rain
| Updated on: Sep 27, 2025 | 7:54 AM
Share

राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली असून मोठे नुकसान पिकांचे झाले. मात्र, पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज भारतीय हवांमान विभागाकडून अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरला. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दुसरीकडे पुणे, जालना आणि इतर काही भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आलाय.

पुण्याच्या घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाण्यात पावसाला सुरुवात झालीये. अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. जालना जिल्ह्याला आज येलो अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसामुळे जालना जिल्हातील शेतांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पाऊस पडताना दिसत आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाकडून पुन्हा एकदा जालना जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. यामुळे जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे.

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. या पावसात भूम परंडा परिसरातील नळी, दुधना, बानगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पुन्हा नद्या धोक्याच्या पातळी बाहेर प्रवाहित झाल्या आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.