AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

70 किमी वेगाने ताशी वारे, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपिटीची शक्यता, 24 तासात..

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. 15 राज्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

70 किमी वेगाने ताशी वारे, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपिटीची शक्यता, 24 तासात..
Donald Trump
| Updated on: Aug 20, 2026 | 7:23 AM
Share

राज्यात पाऊस कमी अधिक कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी आहे. बीड, परभणी, अहिल्यानगर, नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. हरदोई, कर्नाल या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. धाराशिव, लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज 20 ऑगस्ट रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या काळात अनेक भागांत ताशी 70 किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकते. डोंगराळ भागांसाठी दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून, अनेक नद्यांमधील पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढू शकते. 15 राज्यात पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जिल्ह्याच्या पूर्व भागातील धरणांची स्थिती अद्याप चिंताजनक आहे. अक्कलकुवा-वडफळे परिसरातील अनेक धरणांमध्ये दमदार पाऊस न झाल्याने अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे भविष्यातील सिंचनाचा प्रश्न कायम असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नदी-नाल्यांना अद्याप मोठा प्रवाह आलेला नसल्याने धरणे भरण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. सध्या पिकांना विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याचा आधार मिळत असला, तरी भूजलपातळी वाढण्यासाठी आणि आगामी काळातील सिंचनाची गरज भागवण्यासाठी पुरेसा पाऊस होणे आवश्यक आहे. त्यामुळे खरीप हंगामाची आशा आता पूर्णपणे पावसावर टिकून असून, धरणे आणि जलसाठे भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही भागात पाऊस होत आहे तर काही भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?