AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा पावसाचे संकट! 5 जिल्ह्यांमध्ये मोठा धोका, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास..

गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आज पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागकडून देण्यात आला.

पुन्हा पावसाचे संकट! 5 जिल्ह्यांमध्ये मोठा धोका, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास..
Rain
| Updated on: Mar 24, 2026 | 7:09 AM
Share

मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासून अनेक भागात सतत पाऊस कोसळत आहे. अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच अनेक भागात उष्णता देखील वाढत आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. आज राज्यातील अनेक भागातील हवामानात चढउतार बघायला मिळेल. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. कोकणात आज दमट आणि उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देत येलो अलर्ट कोकणात देण्यात आला. वाशिम येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली.

वाशिम येथे उच्चांकी 37.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले. धुळ्यात 13.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. आज धाराशिव, लातूर, सोलापूर, नांदेड आणि लातूर या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस सतत हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बीचे पिक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने मोठे चिंतेचे वातावरण आहे. मार्च महिन्याती पाऊस होत असल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. सांगली, सातारा आणि सोलापूरमध्येही अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले.

बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे 13 तालुक्यांतील 201 गावांमधील 6460 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान सिंदखेड राजा, मेहकर तालुक्यांत तुलनेने नुकसान कमी आहे. प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून प्राथमिक अंदाजानुसार मलकापूर आणि लोणार तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, ज्वारी, हरभर, कांदा सह इतर पिकांचा समावेश आहे. प्रशासनाकडून सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, पाऊस असूनही काही थांबण्याचे नाव घेत नाही.

Follow Us
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!