AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा कोसळणार पाऊस! मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर संकट, शेतकरी चिंतेत, थेट..

राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावताना दिसत आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. काही जिल्ह्यांमध्ये आजही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुन्हा कोसळणार पाऊस! मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर संकट, शेतकरी चिंतेत, थेट..
Rain Warning
| Updated on: Mar 23, 2026 | 7:12 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मार्च महिना संपत आलेला असतानाही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. सतत अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. राज्यात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात आजही अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यातील इतर भागात उन्हाचा चटका अधिक तीव्र होणार आहे. भारतीय हवामान विभागाने कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला. आज सांगली, सातारा, धाराशिव, लातूर, सोलापूर या भागात पावसाचा इशारा देण्यात आला. मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा असला तरीही राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरणासह पाऊस येण्याची शक्यता आहे. आज राज्यातील हवामान सतत चढउतार बघायला मिळेल. राज्यासह देशातील अनेक भागात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. राज्यातील मागील चार ते पाच दिवसांपासून सतत काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड येथे वादळी वाऱ्यामुळे चार एकरावरील ज्वारी जमीनदोस्त झाली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याची चार एकरवरील ज्वारी पूर्णपणे आडवी पडली असून लाखांचे नुकसान झाले आहे. तब्बल 100 क्विंटल ज्वारीचे उत्पन्न आले असते. मात्र वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे

हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी शेतकरी हतबल झाला असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे . गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. निफाड तालुक्यात 18 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटने सहा गावातील 396 शेतकऱ्यांचे 165 हेक्टरवरील कांदा, गहू द्राक्ष शेतीचे नुकसान झाले तर दुसऱ्या दिवशी 19 मार्च रोजी 16 गावातील 1364 शेतकऱ्यांचे 622 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, कांदा, गहू, मिर्ची नुकसान झाले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत