AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतून महिन्याभरापूर्वी गायब झालेला पाऊस अचानक का सुरू झाला? आक्राळविक्राळ कोसळण्याचं कारण काय? सर्वात मोठी अपडेट समोर

Maharashtra Rain Update : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे. फक्त मुंबईच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पावसाने हजेरी लावलीये.

मुंबईतून महिन्याभरापूर्वी गायब झालेला पाऊस अचानक का सुरू झाला? आक्राळविक्राळ कोसळण्याचं कारण काय? सर्वात मोठी अपडेट समोर
Rain
| Updated on: Sep 15, 2025 | 11:46 AM
Share

मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस कमी झाल्याचे चित्र होते. मुंबईमध्ये तर महिन्याभरानंतर अतिमुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. मुंबईसह, पुणे आणि रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. अचानक महिन्याभराच्या विश्रांतीनंतर मुंबईत इतका जास्त पाऊस पडण्याचे मोठे कारण हे पुढे आले आहे. पुढील दोन ते तीन दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान चारही विभागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

मुंबईत इतका जास्त पाऊस पडण्याचे मोठे कारण असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यात पाऊस कोसळतोय. मुंबईत पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच, वाऱ्याचा वेग देखील 30-40 किमी प्रति तास राहण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आली आहे.

मुंबई आणि उपनगरसह विदर्भ, कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाला आहे. हवामान खात्याने आज मुंबई आणि उपनगरांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड जिल्ह्याला आज सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण आहे. संभाव्य अलर्ट लक्ष्यात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.

कोकणात पुढील चार दिवस पाऊस कोसळणार आहे. रात्रीपासून कोकणात ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी मात्र पावसाची विश्रांती बघायला मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. काही भागात कमी वेळात जास्त पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस असणारा आहे.

पुणे शहर आणि जिल्हा परिसरात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय तर पुण्याचा घाटमाथा आणि धरण परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सहा मंडळात झाली अतिवृष्टीची नोंद;अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीप पिकांसह फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत.

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.