AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावरील संकट कायम, या 10 जिल्ह्यांना थेट इशारा, घराबाहेर पडणे टाळाच, पुढील 25 तास…

Maharashtra Rain Update : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, या पावसाने इतका कहर केला की, काही भागात अतिवृष्टी झाली असून लोकांची घरे पूर्णपणे पाण्यात गेली आहेत. यासोबत पिकांचे मोठे नुकसान झाले. आजही मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

राज्यावरील संकट कायम, या 10 जिल्ह्यांना थेट इशारा, घराबाहेर पडणे टाळाच, पुढील 25 तास...
rain
| Updated on: Sep 29, 2025 | 7:31 AM
Share

राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. अनेक गावे, शेती पाण्याखाली आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पूरस्थिती संदर्भात एक बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. अजूनही धोका टळला नसून आजचा दिवस अलर्ट राहण्याची गरज आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज वर्तवला आहे. उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रमध्ये आजही विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू असून पिके वाहून गेली आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, पुणे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. धुळे, आहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबारमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केली जात आहेत. ज्या भागात अतिवृष्टी झाली, त्याठिकाणी पंचनामे सध्या सुरू आहेत. मुंबईमध्ये रात्री पावसाचा जोर अधिक होता. आता रिमझिम पाऊस सध्या मुंबईमध्ये सुरू असून ढगाळ वातावरण आहे. काल दिवसभर मुसळधार पावसानंतर आज सकाळपासून मुंबई उपनगरात पाऊस बंद आहे. मुंबईमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

जाफराबाद तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह उसाचे मोठे नुकसान झाले आहे. देवळेगव्हाण येथील 12 ते 13 शेतकऱ्याच मिळून जवळपास 90 एकर क्षेत्रावरील उसाच पीक आडवे झाले. पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय. जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील देवळेगव्हाण, गाडेगव्हाण, बुटखेडा, लोणगाव यासह आसपासच्या परिसरात काल सायंकाळी आणि मध्यरात्री पावसाने हजेरी लावली.

शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांसह ऊसाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. देवळेगव्हाण या गावातील 12 ते 13 शेतकऱ्यांचा मिळून जवळपास 80 एकर क्षेत्रावरील ऊस जमीनदोस्त झाल्याने प्रचंड नुकसान झाले. दरम्यान जालना जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी देखील शेतकऱ्यांची चिंता मात्र काही कमी झालेली नाही.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.