AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

55 किमी प्रतितास वेगाने राज्यावर येतंय मोठं संकट, पावसासोबत अजून एक मोठा धोका, 24 तास घराबाहेर पडणे..

Marathwada Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. आता पावसाने थैमान घालण्यास सुरूवात केली. फक्त पावसाचेच संकट नसून चक्रीवादळाचेही मोठे संकट बघायला मिळतंय. हवामान खात्याने मोठा इशारा दिला आहे.

55 किमी प्रतितास वेगाने राज्यावर येतंय मोठं संकट, पावसासोबत अजून एक मोठा धोका, 24 तास घराबाहेर पडणे..
cyclone
| Updated on: Oct 27, 2025 | 7:59 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान बघायला मिळतंय. सतत पाऊस सुरू आहे. दिवाळीमध्येही पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. दिवाळी संपली असून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. सध्या राज्यात विविध भागांमध्ये पाऊस सुरू असून रात्रभर मुसळधार पाऊस झाला. सकाळीही ढग कायम असून रिमझिम पाऊस आहे. राज्यात अनेक भागांमध्ये मोठी अतिवृष्टी झाली. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा रविवारी तीव्र होऊन खोल कमी दाबाचा पट्टा बनला आहे. आता त्याचे रूपांतर मोंथा चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर 25 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग 35 ते 45 किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 55 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो.

हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत आज हवामान ढगाळ आहे, तर पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरातील काही भागांत रविवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आजही संध्याकाळी  अशीच परिस्थिती राहणार असल्याची माहिती आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत 14.6 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 6.6 मिमी पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी नैर्ऋत्येकडे सरकले. पुढील 24 तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्येकडे आणि नंतर पूर्व-मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे. हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक