AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांचा भाजपला मोठा झटका, जळगावात मोठं खिंडार, ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला मोठा झटका दिला आहे. जळगावचा बडा नेता असलेल्या एका माजी आमदाराने भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय.

शरद पवार यांचा भाजपला मोठा झटका, जळगावात मोठं खिंडार, 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
| Updated on: Sep 05, 2023 | 2:50 PM
Share

जळगाव | 5 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच भाजपला मोठा झटका दिल्याची बातमी ताजी असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला झटका दिलाय. भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी काल ठाकरे गटात प्रवेश केला. साजन पाचपुते आपल्या आईसह 250 ते 300 गाड्यांचा ताफा घेऊन उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आले होते. त्यांचा काल पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आता शरद पवार यांनी भाजपला मोठा झटका दिलाय.

जळगाव जिल्ह्यात तब्बल तीन वेळा आमदारकी भूषविणारा भाजप नेता बी एस पाटील आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे फक्त बी एस पाटील हेच नाहीत तर आणखी काही माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे जळगावात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

शरद पवार मंत्री अनिल पाटील यांच्यावर काय बोलणार?

शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. त्यांची जळगावात आज सभा पार पडणार आहे. जळगावच्या अमळनेर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री अनिल पाटील निवडून आले आहेत. अनिल पाटील यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात शरद पवार काय प्रहार करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बी एस पाटील तीन वेळा आमदार

बी एस पाटील हे खान्देशातील मोठं नाव आहे. ते तीनवेळा आमदार राहिले आहेत. त्यांना 2009 च्या निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते स्वगृही भाजपात परतले होते.

बी एस पाटील हे 2019 मध्ये चर्चेत आले होते. भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यात वाद उफाळला होता. विशेष म्हणजे अमळनेरला एक जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उदय वाघ यांच्या समर्थकांनी बी एस पाटील यांना मारहाण केली होती. यावेळी मंचावर मंत्री गिरीश महाजन हे देखील होते.

ऑपरेशन लोटसमधून अजित पवारांचं बरं वाईट झालं नाही ना? राऊतांचा प्रश्न
ऑपरेशन लोटसमधून अजित पवारांचं बरं वाईट झालं नाही ना? राऊतांचा प्रश्न.
शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी! निफ्टी 1 हजार 219 अंकांनी वाढला
शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी! निफ्टी 1 हजार 219 अंकांनी वाढला.
कुठेतरी काहीतरी गडबड झालीये! छगन भुजबळांचं विमान अपघातावर मोठं वक्तव्य
कुठेतरी काहीतरी गडबड झालीये! छगन भुजबळांचं विमान अपघातावर मोठं वक्तव्य.
अजित पवार परत आले असते तर ऑपरेशन लोटसचा पराभव झाला असता...
अजित पवार परत आले असते तर ऑपरेशन लोटसचा पराभव झाला असता....
मुंबईत मराठी विरुद्ध तामिळ वाद पेटवण्याचा प्रयत्न?
मुंबईत मराठी विरुद्ध तामिळ वाद पेटवण्याचा प्रयत्न?.
पटेलांचं नाव राष्ट्रवादीच्या नेत्यांना पटेल काय?
पटेलांचं नाव राष्ट्रवादीच्या नेत्यांना पटेल काय?.
अप्रकाशित पुस्तकावरून संसदेत गदारोळ!राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
अप्रकाशित पुस्तकावरून संसदेत गदारोळ!राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न.
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.