AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधकांवर हल्लोबोल, स्वपक्षीयांना सुनावलं; देवेंद्र फडणवीसांचं ‘लाडक्या बहिणीं’ना संबोधन

DCM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. जळगावमध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वपक्षीयांना सुनावलं आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...

विरोधकांवर हल्लोबोल, स्वपक्षीयांना सुनावलं; देवेंद्र फडणवीसांचं 'लाडक्या बहिणीं'ना संबोधन
देवेंद्र फडणवीसImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 13, 2024 | 5:19 PM
Share

जळगावममधील सागर पार्कमध्ये शासनाकडून महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण योजने’वर भाष्य केलं. तेव्हा त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसंच महायुतीतील नेत्यांनाही सुनावलं आहे. जर तुम्ही महायुतीला आशिर्वाद दिला नाही. तर तुमच्याकडून 1500 रूपये काढून घेऊ, असं आमदार रवी राणा म्हणाले होते. त्यांना फडणवीसांना भरसभेत सुनावलं आहे.

रवी राणांच्या विधानावर काय म्हणाले?

आमचे नेते गमतीगमतीत बोलताना काहीही बोलतात, कुणीतरी म्हणतं की लाडकी बहीण योजनेचे पैस परत घेऊ. पण अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि मायाच मिळत असते. निवडणुका येतात – जातात पण मला विश्वास आहे. बहिणींचा आशिर्वाद आमच्या पाठिशी असेल. जो पर्यंत आमचं त्रिमूर्तींचं सरकार सत्तेत आहे. तोवर बहिणींसाठीची ही योजना कुणाचा बापही बंद करू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधकांना टोला

रोज हे नवीन नवीन खोटं सांगतात हे खोटं सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या शब्दात सांगतो. काही लोक खोटं बोलून बोलून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेत संविधान बदलल्याबद्दल खोटं विरोधकांनी पसरवलं. ज्या ठिकाणी चंद्राने सूर्या जोपर्यंत आहे. तोपर्यंत कोणी आरक्षण संपवू शकत नाही. निवडणूक आल्या काय हे खोटो पसरवण्याचे काम करतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

महिला सक्षम झाल्या तर महाराष्ट्राला कोणीच थांबू शकणार नाही. सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण करत आहे. मुख्यमंत्री महोदय जळगावच्या रस्त्यांच्या विकासासाठी 100 कोटी रुपये द्यावे अशी आमच्या जळगाव मधल्या नेत्यांची मागणी आहे. नाळपार योजनेच्या संदर्भात कोणाच्या मनात शंका असेल तर ते काढून टाकावं. यासंदर्भात मी राज्यपालांचे भेट घेतलेले आहे नागपंच पाणी शेतकऱ्यांना भेटण्यासंदर्भात कोणीच थांबू शकत नाही. जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे अनेक प्रकल्प आपण मार्ग लावलेले आहेत. जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. बहिणींच्या प्रेमाचं कवच आहे. त्यामुळे आमचं कोणीच काही वाकड करू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष