AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दहा ते बारा दुचाकींना चिरडलं

जळगाव जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जामनेरमध्ये ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दहा ते बारा दुचाकींना चिरडलं
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2025 | 8:00 PM
Share

जळगाव जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जामनेरमध्ये ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रॅक्टर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  जामनेर शहरातील वाकी रोड परिसरात हा अपघात घडला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात घडला आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या टॅक्टरनं उभ्या असलेल्या दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही, मात्र दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे.  जामनेर शहरातील वाकी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणावरून जात असताना अचानक चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं, त्यानंतर अनियंत्रित झालेल्या ट्रॅक्टरनं या परिसरात पोस्ट ऑफिस तसेच बँकेबाहेर उभ्या असलेल्या दुचाकींना उडवलं, या घटनेत दहा ते बारा दुचाकींचं नुकसान झालं आहे.

दरम्यान अपघात घडल्यानंतर चालक ट्रॅक्टर जोगेवरच सोडून पसार झाला. चालक दारूच्या नशेत असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या अपघातामध्ये दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. दुचाकी मालकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानाची पाहाणी केली. ज्या वाहनांचं नुकसान झालं आहे, त्यांच्या मालकांची नावं लिहून घेण्यात आली आहेत. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, त्याचा शोध सुरू असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती या अपघात प्रकरणात पोलिसांनी दिली आहे.

या अपघातामध्ये दुचाकींचं मोठं नुकसान झालं  आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे, मात्र चालक हा दारूच्या नशेत असावा असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.  अपघातानंतर चालक लगेचच घटनास्थळावरून फरार झाला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.