AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसेंच्या ‘राजकीय घुमजाव’वर जयंत पाटील यांचं भाष्य; म्हणाले, त्यांनी आधी….

Jayant Patil on Eknath Khadse : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय भूमिकेवर भाष्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि जळगावमधील राजकीय परिस्थिती यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

एकनाथ खडसेंच्या 'राजकीय घुमजाव'वर जयंत पाटील यांचं भाष्य; म्हणाले, त्यांनी आधी....
जयंत पाटीलImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 22, 2024 | 1:45 PM
Share

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करणार होते. उघडपणे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र भाजपकडून ग्रीन सिग्नल न आल्याने खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणं पसंत केलं आहे. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. खडसे यांनी त्यांच्यावरची परिस्थिती मला सांगितली होती. पवार साहेबांना सांगितली होती. त्यावेळच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी काही सूट मागितली होती. त्यावेळी त्यांना सूट देण्याचे ठरवलेलं होतं, असं जयंत पाटील म्हणालेत.

एकनाथ खडसेंच्या भूमिकेवर काय म्हणाले?

एकनाथ खडसे यांच्यावर आलेली परिस्थिती ही खूप अडचणीची होती. ती परिस्थिती आता निवळलेली आहे. त्यामुळे त्यांना त्यावेळी पक्ष सोडण्याची आवश्यकता वाटली नाही. पण त्यांनी ही परिस्थिती कानावर टाकली होती. खडसे नेत्यांच्या वरचे परिस्थिती मला आणि पवार साहेबांना सांगितले होते. त्यांच्यावर आलेली परिस्थिती प्रचंड अडचणीची होती, असं म्हणत जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे.

जळगावमधील राजकीय परिस्थितीवर जयंत पाटील काय म्हणाले?

जळगाव जिल्हा हा पूर्ण महायुतीच्या विरोधात केलेला मला दिसतो आहे. या ठिकाणची बेरोजगारी, अशी वेगवेगळी कारण याला आहेत त्यामुळे जळगावचे तरुण पेटलेला आहे. मागे असेल बेरोजगारी असेल हे राज्यातले मुख्य प्रश्न आहेत ते जिल्ह्यात सुद्धा आहेत आणि जळगावकरांना ते सहन करावा लागत आहेत. या सर्व प्रश्नांची सुटका करण्यासाठी महाविकास आघाडीचा सोबत राहण्याचा या ठिकाणचा जनतेचा मानस दिसतो आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

निवडणूक आयोगाच्या लोकांना बिचाऱ्यांना अजून माहित नाही की माहितीचे स्थानिक नेते निवडणुकांना अजूनही घाबरलेले आहेत. निवडणुका घ्यायच्या नाही. ते दोन दिवस येऊन गेल्यानंतर त्यांना कळविण्यात येईल की आणखी काही दिवस मार्ग काढा निवडणुका कशा पुढे ढकलता येतील, असं म्हणत जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या दौऱ्यावर भाष्य केलं.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!