AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नागरिकांचा आता केंद्र-राज्य सरकारवरचा विश्वास कमी होत चालला”; राष्ट्रवादीच्या नेत्याने जनसामान्यांची बाजू सांगितली…

या आमदारांना या जनतेचं काही घेणं देणं पडलेलं नाही असा घणाघाही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे अशा स्थितीत निवडणुका झाल्या तर भाजपाला कमी प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वासही विरोधकांनी व्यक्त केला.

नागरिकांचा आता केंद्र-राज्य सरकारवरचा विश्वास कमी होत चालला; राष्ट्रवादीच्या नेत्याने जनसामान्यांची बाजू सांगितली...
| Updated on: Apr 18, 2023 | 10:12 PM
Share

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्यासह 40 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर अजित पवार यांनी आपण कुठेही जाणार नसून आपण शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबणार असल्याचे सांगत यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्याविषयी भाष्य केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी बोलताना सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.त्यामुळे ते एक जबाबदार पदाधिकारीही आहेत.

त्यामुळे त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या पक्षांमध्ये लोक येतील अशी आशा व्यक्त करणे हे काही गैर नाही असा खोचक टोला त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.

एकनाथ खडसे यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी टीका करताना म्हणाले की, राज्यासह देशात प्रचंड समस्या वाढल्या आहेत. युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण समस्यांनी त्रस्त आहेत.

तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. तर दुसरी बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे.

नागरिकांच्या या कोणत्याही समस्यांकडे ना केंद्राचे लक्ष आहे ना राज्य सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे केंद्र शासन आणि राज्य सरकार यांच्यावरील आता नागरिकांचा विश्वास कमी होत चालला असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

राज्यात सध्या महागाई प्रचंड वाढली आहे, त्याचा फटका जनसामान्यांना बसला आहे. त्याकडेही सरकारचे दुर्लक्ष केले जात आहे. पेट्रोल, गॅसच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत.

त्यामुळे सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालं आहे तरीही सरकार याकडे लक्ष देत नसल्याने आता लोकांकडून सरकारवर नाराजी व्यक्त केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्यातील शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त आहे.

नैसर्गिक संकट आणि बाजारभावामुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. त्याचा फटका येथील प्रत्येक शेतकऱ्याला बसला आहे. त्यामुळे सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रातच झाल्या असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांचीही चिंता नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांनीही ठाकरे गटाच्या टीकेच्या सूरात सूर मिसळून त्यांनीही 50 खोके एकदम ओके अशा मस्तीमध्ये हे आमदार सध्या वावरत आहेत. त्यामुळे या आमदारांना या जनतेचं काही घेणं देणं पडलेलं नाही असा घणाघाही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे अशा स्थितीत निवडणुका झाल्या तर भाजपाला कमी प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.