AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नागरिकांचा आता केंद्र-राज्य सरकारवरचा विश्वास कमी होत चालला”; राष्ट्रवादीच्या नेत्याने जनसामान्यांची बाजू सांगितली…

या आमदारांना या जनतेचं काही घेणं देणं पडलेलं नाही असा घणाघाही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे अशा स्थितीत निवडणुका झाल्या तर भाजपाला कमी प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वासही विरोधकांनी व्यक्त केला.

नागरिकांचा आता केंद्र-राज्य सरकारवरचा विश्वास कमी होत चालला; राष्ट्रवादीच्या नेत्याने जनसामान्यांची बाजू सांगितली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 18, 2023 | 10:12 PM
Share

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्यासह 40 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर अजित पवार यांनी आपण कुठेही जाणार नसून आपण शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबणार असल्याचे सांगत यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्याविषयी भाष्य केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी बोलताना सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.त्यामुळे ते एक जबाबदार पदाधिकारीही आहेत.

त्यामुळे त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या पक्षांमध्ये लोक येतील अशी आशा व्यक्त करणे हे काही गैर नाही असा खोचक टोला त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.

एकनाथ खडसे यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी टीका करताना म्हणाले की, राज्यासह देशात प्रचंड समस्या वाढल्या आहेत. युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण समस्यांनी त्रस्त आहेत.

तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. तर दुसरी बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे.

नागरिकांच्या या कोणत्याही समस्यांकडे ना केंद्राचे लक्ष आहे ना राज्य सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे केंद्र शासन आणि राज्य सरकार यांच्यावरील आता नागरिकांचा विश्वास कमी होत चालला असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

राज्यात सध्या महागाई प्रचंड वाढली आहे, त्याचा फटका जनसामान्यांना बसला आहे. त्याकडेही सरकारचे दुर्लक्ष केले जात आहे. पेट्रोल, गॅसच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत.

त्यामुळे सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालं आहे तरीही सरकार याकडे लक्ष देत नसल्याने आता लोकांकडून सरकारवर नाराजी व्यक्त केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्यातील शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त आहे.

नैसर्गिक संकट आणि बाजारभावामुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. त्याचा फटका येथील प्रत्येक शेतकऱ्याला बसला आहे. त्यामुळे सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रातच झाल्या असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांचीही चिंता नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांनीही ठाकरे गटाच्या टीकेच्या सूरात सूर मिसळून त्यांनीही 50 खोके एकदम ओके अशा मस्तीमध्ये हे आमदार सध्या वावरत आहेत. त्यामुळे या आमदारांना या जनतेचं काही घेणं देणं पडलेलं नाही असा घणाघाही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे अशा स्थितीत निवडणुका झाल्या तर भाजपाला कमी प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप