AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजप-शिवसेनेचे मतभेद उघड”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं ‘त्या’ मतभेदाचं कारण सांगितलं…

भाजप हाय कमांडकडून शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना बाजूला करून हटवले पाहिजे अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली असल्याचा संदर्भ त्यांनी दिला आहे.

भाजप-शिवसेनेचे मतभेद उघड; राष्ट्रवादीच्या नेत्यानं 'त्या' मतभेदाचं कारण सांगितलं...
| Updated on: Jun 10, 2023 | 6:51 PM
Share

मुक्ताईनगर : राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादीसग अनेक राजकीय पक्षातील विविघ घटना घडत असल्याने राज्यातील राजकीय गणित नेमकी कशी असणार याकडेच साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून राजकीय गोंधळ माजलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिवसेना आणइ भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर ठपका ठेवत असतानाच त्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या मतभेदावरूनही त्यांनी भाजप आणि शिवसेनेची युती असली तरी त्यांच्यातील मतभेद आता उघडकीस असल्याचेही त्यांनी सांगितेल.

आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, अलिकडच्या कालखंडात भाजप-शिवसेनेचे मतभेद उघडीस येत आहेत. त्यावरूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

अगदी कल्याणचा विषय जर पाहिला तर श्रीकांत शिंदे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कल्याण बहिष्कार टाकल्याची घोषणा केली असल्याचे सांगत त्यांनी आता भाजप आणि शिवसेनेचे जमत नसल्याचे आणि फूट पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजप हाय कमांडकडून शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना बाजूला करून हटवले पाहिजे अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली असल्याचा संदर्भ त्यांनी दिला आहे. तसेच भाजपच्या हाय कमांडकडून शिंदे गटातील निष्क्रिय मंत्र्याना हटवण्याचा विचार भाजपवाले करत असल्याचेही त्यांनी विश्वासाने सांगितले.

या निष्क्रिय मंत्र्यांमध्य आपल्या जळगावच्या मंत्र्याचाही सहभाग असल्याचे सांगत त्यांनी गुलाबराव पाटील यांचाही त्यामध्ये समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की, गुलाबराव पाटील यांच्यावरही ठपका ठेवण्यात आल्याचे दिसत असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कुठलेही कामे झालेले नाही.

तसेच भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यामध्ये झाला असून या सगळ्या प्रकरणाचा ठपका त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर ठेवला आहे. तसेच गुलाबराव पाटील हे निष्क्रिय आहेत असं भाजपवाल्याना वाटत असल्यामुळेच दिल्लीच्या वरिष्ठांकडेही त्यांनी तक्रारी केल्या आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या सर्व कारणामुळेच शिवसेनेतील निष्क्रिय पाच मंत्र्यांना हटवण्याचा निर्णय असू शकतो असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.