AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांच्या गंभीर आरोपानंतर आता फडणवीस काय बोलणार??

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिय दिली आहे. अगदी थोडक्यात फडणवीस बोलले आहेत मात्र जरांगे काय बोलेल हे एकून ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनोज जरांगे यांच्या गंभीर आरोपानंतर आता फडणवीस काय बोलणार??
manoj jarange patil and devendra fadnavis Image Credit source: TV9MARATHI
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 25, 2024 | 4:04 PM
Share

जालना : मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा एनकाऊंटर करायचा असून माझ्याविरोधात फडणवीस षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा कट असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केले आहेत. अशातच यावर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या आरोपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांनी जरांगे यांनी केलेल्या आरोपावर बोलताना, जरांगे काय बोलले ते ऐकून मी यावर बोलेल असं फणडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस आता काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळावरून देवेंद्र फणडवीस यांच्यावर आरोप करत मुंबईमध्ये सागर बंगल्याच्या दिशेने येण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे पायी निघाले होते  पण गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून ते उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. मराठा बांधव त्यांना मुंबईला जावू नक अशी विनंती करत आहेत. मात्र जरांगे आता गाडीमध्ये बसले असून ते सागर बंगल्यावर येण्यासाठी ठाम आहेत.

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गंभीर असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.  मात्र भाजप नेत्यांनीही आता आक्रमक भमिका घेतलेली पाहायला मिळत आहे.

नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत