AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं; मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी

Manoj Jarage Patil on Special Session For Maratha Reservation : राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? पाहा...

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं; मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी
| Updated on: Oct 31, 2023 | 11:29 AM
Share

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जालना | 31 ऑक्टोबर 2023 : राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी आरक्षणावर चर्चा झाली. बाकी दुसरी काही झाली नाही. आपण त्यांना स्पष्ट सांगितलं की , नोंदीनुसार आरक्षण घ्यायला तयार नाही. समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट अधिवेश देण्याचा निर्णय घ्या. विशेष अधिवेशन बोलवा. अर्धवट आरक्षण घेणार नाही. ते तुम्ही देऊ नका. स्पष्ट शब्दात सांगितलं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी थोड्यावेळाआधी फोनवरून बातचित केल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

आम्ही आमच्या अभ्यासकांची १२ ते १ वाजता बैठक बोलावली. वकिलांशी चर्चा करणार आहोत. पण ८३ क्रमांकावर ओबीसीतील जाती मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हटलंय. २००४चा जीआर आहे. तो दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारीत जाती निर्माण झाल्या आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. त्याच धर्तीवर आरक्षण द्या. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. तुम्ही कितीही बहाणे सांगितलं तरी ऐकणार नाही. असं मुख्यमंत्री शिंदे यांना आम्ही स्पष्ट सांगितलं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. कायदा पारित करण्यासाठी पुरावा आहे. फक्त समितीला राज्याचा दर्जा द्यायचा आहे. एका पुराव्यावरही आरक्षण देऊ शकता. तुमच्याकडे भरपूर पुरावे आहे. व्यवसाय शेती असल्याने अडचण येत नाही. कुणाचं आरक्षण कमी होणार नाही. ६० टक्के समाज ओबीसीत आहे. आम्ही थोडे आहोत. ५ कोटी मराठा आरक्षणात येत नाही. आम्ही थोडे आहोत. मराठवाडा आणि इतर भागातील आहे. ज्यांना प्रमाणपत्र हवं ते घेतील. ज्यांना नको ते घेणार नाही. कुणावर जोरजबरदस्ती नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं मराठे शांत झालेत. तुम्ही पटकन आरक्षण द्या. मराठे सर्व शांत होतील का. तुम्ही अर्धवट आरक्षण देऊ नका, असंही मनोज जरांगे म्हणालेत.

Follow Us
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.