AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा पोरांविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं; मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा आरोप

Manoj Jarange Patil on CM Ekanath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : शिंदे सरकारवर मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा आरोप... मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा पोरांविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं; मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा आरोप
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2023 | 3:38 PM
Share

जालना | 27 ऑक्टोबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारवर सर्वात मोठा आरोप केला आहे. मराठा समाजातील तरुणांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाला अपेक्षा होती. परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना आरक्षणाबाबत काही सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण त्यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाचा लढा पंतप्रधानांना सांगितलं नाही अशी शंका आहे. जर पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षण आणि आंदोलनाबाबत सांगितलं असेल तर पंतप्रधान जाणूनबुजून आरक्षणावर बोलले नाहीत असं समजायचं का. याची शंका आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी काल मराठा आरक्षणाचा विषय घेतला नाही. याचा अर्थ त्यांना सांगितलं नाही. सांगितलं असेल तर त्यांनी जाणूनबुजून हा विषय घेतला नाही. ही शंका आहे. पंतप्रधांनाना गोरगरीबांची गरज राहिली नाही असा त्यातून राज्यातील जनता अर्थ काढत आहे. पंतप्रधानांनी काल विषय घ्यायला हवा होता. पण दोन्ही बाजूच्या चर्चा सुरू आहेत. एक तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून सांगितलं नाही. किंवा पंतप्रधानांना सांगितलं पण त्यांनी जाणूनबुजून आरक्षणाचा विषय घेतला नाही. या दोन्ही शंकापैकी एक शंका मराठ्यांच्या मनात शंभर टक्के आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

इतक्या जवळ येऊन पंतप्रधान देशव्यापी आंदोलन घेत नाही याचा अर्थ त्यांना सांगितलं नाही किंवा त्यांनी घेतला नाही. त्यांनी विषय घेतला काय आणि नाही घेतला काय मराठ्यांना फरक पडत नाही. पण समाज यासाठी शांत होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि राज्य सरकारला हा विषय मार्गी काढायला सांगतील. मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांच्या मनात पाप नव्हतं. वाईट नव्हतं. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्या विषयी वाईट भावना असतील. तर मराठ्यांनी त्यांचं विमानही शिर्डीला उतरू दिलं नसतं, असं म्हणत जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चव्हाण- तटकरे यांच्यात बैठक, नेमकं कारण काय? मोठी माहिती समोर!
चव्हाण- तटकरे यांच्यात बैठक, नेमकं कारण काय? मोठी माहिती समोर!.
गॅझेटनंतरही प्रमाणपत्रे नाहीत; सरकारला जरांगे पाटलांचा इशारा
गॅझेटनंतरही प्रमाणपत्रे नाहीत; सरकारला जरांगे पाटलांचा इशारा.
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर रोहित पवारांचा मोठा दावा
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर रोहित पवारांचा मोठा दावा.
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर... सपकाळ यांच्याकडून दिलगिरी
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर... सपकाळ यांच्याकडून दिलगिरी.
मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी, राऊत आणि भाजपमध्ये जुंपली
मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी, राऊत आणि भाजपमध्ये जुंपली.
अजित पवारांचं विमान बनवलं त्या देशातून माहिती मागवली
अजित पवारांचं विमान बनवलं त्या देशातून माहिती मागवली.
कुणाल कामरा विधानभवनात चौकशीसाठी हजर! पुढची सुनावणी 10 मार्चला
कुणाल कामरा विधानभवनात चौकशीसाठी हजर! पुढची सुनावणी 10 मार्चला.
पार्थ पवारांच्या क्लीन चिटवर अंजली दमानियांचे गंभीर प्रश्न
पार्थ पवारांच्या क्लीन चिटवर अंजली दमानियांचे गंभीर प्रश्न.
रोहित पवारांच्या वक्तव्यावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया
रोहित पवारांच्या वक्तव्यावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया.
आमच्याकडे अनेक पुरावे, उद्या गौप्यस्फोट करणार; रोहित पवारांची माहिती
आमच्याकडे अनेक पुरावे, उद्या गौप्यस्फोट करणार; रोहित पवारांची माहिती.