AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एका बाजूनं बोलण्यापेक्षा…’; प्रकाश आंबेडकरांना मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी सगेसोयरे भेसळ असल्याचं म्हटलं होतं. यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

'एका बाजूनं बोलण्यापेक्षा...'; प्रकाश आंबेडकरांना मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 16, 2024 | 7:45 PM
Share

राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पेटलेला असताना आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सगेसोयरे भेसळ असल्याचं म्हटलं होतं. यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे.

मंत्र्यांनी न्यायाधीशांनी आणि कायद्याच्या अभ्यासाकांनी मिळून ठरवलेली आहे. आणि ती पक्की आहे आणि टिकणार सुद्धा, त्याच्यात सगळ्या जाती-धर्मांना न्याय मिळणार आहे.ते जर भेसळ असेल ,तर 50% च्या वर दोन टक्के दिलेल आहे हेही भेसळच असणार आहे. 180 जाती आरक्षणात घातल्या होत्या आता साडेतीनशे-चारशे जाती झाल्या,त्याही भेसळ असतील मग घातलेल्या. त्याच्यावरही आंबेडकर साहेबांनी बोलायला पाहिजे एक्सट्रा जाती कुठून आल्या. प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा बोगस शब्द वापरू, असं मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाज संपवावा किंवा त्यांना आरक्षण मिळू नये याबाबतीचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये. त्यांच्याकडून सगळ्यांना सारखं चौफेर टाईट बोलण्यात यावं. सगळ्यांची सारखी बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे. ही जनतेची अपेक्षा आहे त्यापेक्षा माझी जास्त आहे. सगळ्या जाती धर्मातले लोक त्यांना याच कारणाने मानतात कि ते स्पष्ट बोलतात,खर आहे ते बोलतात, एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी सगळीकडून सारखी मांडणी करावी एवढीच आमची अपेक्षा असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

गरीब मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे हे 70 वर्षात कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही. श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते जे राजकारणात होते. यांच्या मनात गोरगरिबांना मोठे होऊ देऊ हे नव्हतं म्हणून तर मी गरीब माझा समाज गरीब म्हणून आम्ही गरिबांनीच ही लढाई उभा केली. श्रीमंत आपल्याला कधीच मोठं करणार नाही म्हणून आमची लढाई आम्ही उभे केले आणि जिंकत आणल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

Follow Us
प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती...
Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपद...
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी... NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा...
Mumbai High Court | मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा, उपवर्गीकरणाचा दाखला देत काय म्हटलं?
मोठी बातमी! एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला
मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, राजकीय हालचाली वाढल्या
पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?
Abhijeet Dipke | पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?; नेमकी काय आहे मागणी?
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणी
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणींचा उल्लेख करत संजय राऊतांनी सांगितलं गुपित
पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय घडामोडींना वेग
Amit Shah Mumbai Visit | पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय आढाव्यासह दोन महत्त्वाचे कार्यक्रम, राजकीय घडामोडींना वेग
मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने...
मोठी बातमी! मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने वाढली चिंता, नेमकं काय होणार?
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!